
ना.आठवले यांचे प्रमुख उपस्थितीत कोपरगाव येथे संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन!!
जेऊर कुंभारी वार्ताहर
शनिवार दिनांक ३फेब्रुवारी रोजी आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकरिता राज्यमंत्री ना.आठवले हे नगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचे प्रमुख उपस्थितीत कोपरगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे संविधान सन्मान सोहळा व समता परिषदेचे आयोजन तालुका आरपीआय चे वतीने करण्यात आले असून यावेळी ना. आठवले यांचे हस्ते पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार असून सदर कार्यक्रमासाठी तालुका व शहर कार्यकरणी कडून कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती आर पी आय राज्य सचिव व कार्यक्रमांचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तालुक्यांच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, खासदार सदाशिव लोखंडे,आमदार आशुतोषदादा काळे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, भाजपा चे राज्य नेते रविकाका बोरवके, महानंदाचे चेअरमन राजेश आबा परजने यांसह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात,युवक जिल्हाध्यक्ष पप्पुभाऊ बनसोडे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे हे जिल्हा व तालुका स्तरावर बैठका घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीचे दृष्टीने आठवले यांचा हा नगर जिल्हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असून या दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी ना. आठवले यांचे सोबत राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राष्ट्रिय संघटक प्रमुख ॲड. बी के बर्वे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ गायकवाड यांचेसह राज्य व जिल्ह्याचे नेते उपास्थित राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तर सदर संविधान सन्मान सोहळा व समता परिषदेचे निमित्ताने श्री विठ्ठल कांगणे सर यांचे प्रमुख व्याख्यान व कडूबाई खरात यांचा भीमगीताचा जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांनी दिली. सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ व युवा नेते,पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपास्थित राहणार असुन सर्व संविधानप्रेमी नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव तालुका व शहर आरपीआय कार्यकारणी चे वतीने करण्यात आले.


