








जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील ओम गुरूदेव गुरूकुलाची २००४ च्या बॅचचे विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले. या प्रसंगी निरंजन डांगे,राज्यश्री पिंगळे,देठे सर,आदी शिक्षक वूंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून झाली सर्व शिक्षकांना श्रीफळ देऊन माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला.
आजचे शिक्षक, मोठे उद्योगपती, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, तसेच प्रगतिशील शेतकरी व अनेक उच्च पदावर कार्य करत असणारे अनेक जन २०वर्षानंतर सावळीविहिर येथील अगत्य कृषी पर्यटन केंद्रात शिक्षण जीवनातील आठवणींना उजाळा देत होते.
२० वर्ष नंतर सगळ्यांच्या मनात तोच जिव्हाळा आणि तीच आपुलकी बघायला भेटली. आयुष्यात किती मोठं झाल तरी आपली नाळ आपल्या मातीशी, माणसांशी आणि गावाशी जोडली गेली आहेत याचा उत्तम उदाहरण म्हणजे हे
स्नेहसंमेलन. तेथून निघताना पुन्हा भेटण्याचे व संपर्कात राहण्याचे आश्वासन देवून पुन्हा एकदा सगळे आपापल्या वाटेला व कामाला रुजू झाले. याप्रसंगी अमोल प्रभाकर
जमधडे,प्राध्यापक मधुकर वक्ते,शशिकांत वक्ते,सचिन जमधडे,अजित डिके,फजल पटेल,विकास डिके,यशवंत जेऊघाले, पवन गायकवाड, चेतन विधाते,विदुर पुंगळ,सुजित कालेकर,गणेश काकड, प्रमोद काकडे,अनंता घायाळ,गणेश उगले,गौरव शिंदे,किशोर वाकचौरे, प्रविण शेळके,अजय (तेली)चौधरी,हेमंत देसाई, नितिन पगार, नितिन पवार, उज्वल वागुळदे, नितिन चौधरी,समाधान चव्हाण,मंजुषा कोते,मिनाक्षी चव्हाण, सुनिता काशिद,प्रतिभा पवार,जगदीश बनकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत वक्ते, मयुरी लोंढे यांनी तर आभार यशवंत जेऊघाले यांनी मानले.



