
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी ग्रामपंचायतीच्या
कारभाराची चौकशी होऊन ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला लगाम घालावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल अशा आशयाचा जेऊरकुंभारी गावातील युवकांनी कोपरगाव गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
जेऊरकुंभारी ग्रामपंचयातीच्या कामाची पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्यात यावी यासाठी आज दि. १३ डिसेंबर रोजी येथील युवा तरूण मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य चव्हाण, शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल गुरसळ, महारुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत वक्ते, पत्रकार बिपीन गायकवाड , राजेंद्र गांगुर्डे
सिद्धार्थ दौंड, निलेश चव्हाण ,नागेश दळवी,अमोल राऊत यांच्यासह युवकांनी कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या वतीने सी.आर.कक्षअधिकारी, नलगे एस.डी कार्यलयीन अधिक्षक यांना लेखी निवेदन दिले. ग्रामपंचायतीची कोणतीही कामे पारदर्शक होत नाही, ग्रामसेवक मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत याबाबत गटविकास अधिकारी यांच्या वारंवार
निर्दशनास आणले तसेच वेळोवेळी पाठपुरावा करूनही कामाची चौकशी झाली नाही. गावातील सर्व कामे निकृष्ट दर्जाचे होत आहेत, ग्रामसेवक हे ठराविक लोकांच्या दबावाखाली कामे करत आहेत यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गावातील काही रस्त्यांचा निधी येऊन सुद्धा कुणाच्या तरी सांगण्यावरून तो रद्द केला जातो ही गंभीर बाब आहे. यात गटविकास अधिकारी यांनी हस्तक्षेप करून विकास कामे सुरळीत करावी. मोदी आवास योजनेअंतर्गत यादी पाठवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासंदर्भात नागरीकांना माहिती द्यायला पाहीजे होती तसेच ग्रामपंचायत फलकावर प्रसिद्ध करायला हवी होती. मोदी आवास योजनेची माहिती नागरीकांना न देता व अनुक्रमांक नुसार न घेता कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करत आहेत हे जनतेच्या निदर्शनास येत आहे. मोदी आवास योजनेत गैरव्यवहार होत आहे. काही नागरीकांनी विचारणा केली असता आमचे नाव का नाही घेतले तरी ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहे आहे की तुम्ही मराठा ओबीसी आहे त्या कारणाने नाव घेण्यात आले नाही असे उत्तर देण्यात आले तेव्हा या कामाची चौकशी व्हावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून पंचायत समितीसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


