
कोपरगाव प्रतिनिधी
जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीने विकास निधी बँकेत न ठेवता गावात विकास कामे करावी अशी मागणी अजिंक्य चव्हाण यांनी केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाणाऱ्या जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीकडे लाखोंचा निधी बँकेत पडुन आहे परंतु नियोजनाचा अभाव तसेच अकार्यक्षम सदस्य वर्ग यांच्या मुळे गावातील मंजुर विकासकामे एकतर ठप्प किंवा रद्द केली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे दलित वस्तीतील थांबलेली विकासकामे होय,आजतागायात गावात झालेली कामे हि दर्जाची नाहीत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शासना कडुन आलेल्या निधीचा योग्य वापर करायचा नाही,तर तो कोणाच्या घशात घालायचा आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य चव्हाण यांनी उपस्थित केला आहे ते पुढे म्हणाले की जेऊर कुंभारी गावचा विकास झाला पाहिजे ही सर्व सामान्य जनतेची मागणी आहे जेऊर कुंभारी ग्रामपंचायत मध्ये लाखो रूपये निधी शिल्लक असताना कुणीतरी जाणून बुजून विकास कामे होऊ देत नाही त्या झारीतील शुक्राचार्याला जगासमोर आणण्याची गरज आहे या पाश्र्वभुमीवर ग्रामपंचायतीमध्ये निधी संदर्भात चौकशी केली असता निधी शिल्लक नाही असे उत्तर मिळते मग प्रश्न निर्माण झाला की हा शिल्लक असलेला निधी कोणाच्या घशात घालायचा आहे हे स्पष्ट करावे जेऊर कुंभारी गावात सहा दलित वस्ती आहे पण त्यातील जेऊर कुंभारी मारूती मंदिर या दलित वस्तीतला विकास कोण होऊ देत नाही आणी असे का केले जात आहे.या दलित वस्ती मध्ये काँक्रिटीकरण रोड व सीडी वर्क मंजूर झाले होते तसेच पेव्हर ब्लॉक देखील मंजूर झालेले असताना कोणीतरी खोडसळ पणा करून हे काम रद्द केले.या संदर्भात सदस्यांना विचारना केली असता त्यांनी सांगितले की आमच्यावर दबाव येतो आम्हाला काहीच विचारू नका असे जर होत राहीले तर दलित वस्तीची विकास कसा होणार दलित वस्ती अंतर्गतला रस्ता होऊ देणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावच्या दलित वस्तीची कामे का रद्द केली या विषयी पंचायत समितीला जाब विचारणार आहे योग्य उत्तर मिळाले नाहीतर तिव्र प्रकारचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा सामजिक कार्यकर्ते अजिंक्य चव्हाण
यांनी दिला.


