
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात बिबट्याच्या बिनबोभाट फिरण्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लाववा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र वक्ते यांनी केली आहे.दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने अनेक हिंस्र वन्यप्राण्यांचा निवारा नष्ट होत असून, त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा आता मानवी वस्तीकडे वळवला. त्याचाच परिणाम की म्हणुन कोपरगाव तालुक्यातील दररोज कोणत्या ना कोणत्या भागात बिबट्याचे दर्शन होत आहे शेतकऱ्यांमध्ये कायम दहशतीचे वातावरण आहे.
तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात बिबट्याच्या बिनधास्त फिरण्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता महेंद्र वक्ते यांनी केली आहे दोन दिवसांपूर्वी जेऊर गावात महेंद्र वक्ते, वैभव वक्ते यांनी आपल्या शेतीला पाणी भरत असताना सायंकाळी ६ वा अचानक बिबट्याना दिसला तसेच आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी संतोष वक्ते यांनी आपल्या शेतात बाभळीच्या झाडावर बिबट्या
बघीतला त्यांनी प्रसंगावधान राखत आरडा ओरड केला तेव्हा शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना धाव घेतली दिवसां दिवस बिबट्याचे वाढते प्रमाण बघून शेतकरी भयभीत झाले आहे.
सध्या शेती शेतकऱ्यांनी गहु,कांदे हे पीक केलेले आहे रात्रपाळीची लाईट असल्याने रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी व शेतमजूर जाण्यास तयार नाही त्यामुळे शेती पडीत पडते की काय असा प्रश्न या गावांमध्ये निर्माण झाला आहे. जर गावातील नागरिकांना काही इजा झाली तर याला सर्वस्वी वनविभागाचे अधिकारी जबाबदार असतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या बिबट्याचा बंदोबस्त वेळीच केला नाही तर सामाजिक कार्यकर्ता महेंद्र वक्ते,संतोष वक्ते,आदीनी वन विभागाला उपोषणाचा इशारा दिला आहे.


