
कोपरगाव प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी २००८ साली म्हणजे १५ वर्षांपूर्वी कोपरगाव शहर व तालुक्यातील मराठा समाजातील बांधवांनी पक्ष विरहित एकत्र येऊन साईबाबा कॉर्नर येथे भव्य असा रास्ता रोको केला होता. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची सुरुवात खऱ्या अर्थाने कोपरगाव मधून झाली असे मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.. या आंदोलनात त्या वेळी विनय भगत, अनिल गायकवाड व वकील योगेश खालकर हे सामील होते. कोपरगाव शहर व तालुक्यातील मराठा बांधवांचे पक्ष विरहित मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी सर्वात मोठे साईबाबा कॉर्नर येथे महाराष्ट्रातील कदाचित पाहिले रस्ता रोको आंदोलन दिनांक ९/७/ २००८ रोजी केले होते. यावेळी ११ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. दर महिन्याला कोर्टात जावे लागत होते. ही केस सन २०१४ पर्यंत चालू होती. म्हणजे स्वतः च्या हक्कासाठी आंदोलन केले तरी सरकारने गुन्हे दाखल केले होते. या सर्वांनी स्वतः पदर खर्च करून ६ वर्षांनंतर गुन्ह्यातून सुटका झाली असल्याचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी सांगितले.


