
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या मदतीने जेऊर कुंभारी स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे.
चार हजार लोकसंख्या असलेल्या अशा मोठ्या गावात दर्जेदार स्मशानभूमी असणे गरजेचे होते
पुर्वीच्या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय होती.परंतु आता ग्रामपंचायत मार्फत
तसेच ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी साहेब यांनी नवीन शवदानी दिली.जेऊर कुंभारी गावचे समाजीक कार्यकर्ते तसेच महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक मधुकर वक्ते यांच्या पुढाकाराने उद्योजक मिलन कुमार चव्हाण यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीस शेड दिल्याने मरणोत्तर विधी करणे सोईस्कर झाले आहे. तसेच जेऊर कुंभारी गावासाठी सुसज्ज तलाटी कार्यालय होण्यासाठी जागेची अडचण होती तेव्हा रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक संजय नागरे,आकाश नागरे यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ तीन गुंठे जागा दान दिली तसेच रामनाथ आव्हाड यांनी आपल्या वडिल कै.फक्कडराव आव्हाड व मातोश्री गं.भा.मंजुळाबाई आव्हाड
यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार रूपये किमतीचे बाकडे दिले,जेऊर कुंभारी गावातील या दानशुर व्यक्तिंमुळे स्मशानभूमीचा नव्हे तर गावाचा कायापालट झाला असल्याचे गौरवोद्गार संचालक मधुकर वक्ते यांनी काढले आहे तसेच ते पुढे म्हणाले की गावासाठी अशा मोठ्या प्रमाणात दानशूर असतील तर गावाचा विकास व कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.


