Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाविकांसाठी भुयारी मार्ग त्वरित खुला करा !!- आकाश नागरे

भाविकांसाठी भुयारी मार्ग त्वरित खुला करा !!- आकाश नागरे

जेऊर कुंभारी वार्ताहर

गणपती उत्सव नंतर सर्व भक्तांना देवीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. यंदा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पहाटे पासून ते मध्यरात्री पर्यंत जुनी गंगा जगदंबा देवी च्या दर्शनासाठी मोहनीराजनगर या भागातुन मोठ्या प्रमाणात भाविक पायी दर्शनासाठी जातात भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच भुयारी मार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात असून भाविक भक्तांसाठी जाणे येण्यासाठी त्वरित खुला करण्यात यावा अशी मागणी कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या केली आहे.
नगर मनमाड रस्त्याची संपूर्ण चाळण झाल्याने लहान मोठे अपघात होत आहेत. या महामार्गावर अनेक धार्मिक स्थळे आहेत. १५ ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव सुरू होत असून सर्व मंडळ, मंदिर देवस्थानाची तयारी जोरदार सुरू आहे. इतर जिल्ह्यांतून व तालुक्यातुन येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाचे नियोजन देखील अंतिम टप्प्यात आले आहे‌. नगर मनमाड महामार्गावर जुनी गंगा जगदंबा देवीचे मोठं देवस्थान आहे. नवरात्र कालावधीत अनेक भाविक दर्शनासाठी पायी येत असतात. मंदिराच्या जवळच असलेला भुयारी मार्ग भाविकांसाठी खुला केला तर निश्चितच सर्वांसाठी सोयिस्कर होणार आहे‌. प्रशासनाने देखील गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.
पहाटे पासून ते मध्यरात्री पर्यंत जुनी गंगा जगदंबा देवी च्या दर्शनासाठी मोहनीराजनगर या भागातुन पायी कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातुन मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येतात. शहरातील लहान पुलापासून ते देवीच्या मंदिरा पर्यंत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपरिषदेने रस्त्याला पडलेले खड्डे बुजवावे, रस्त्याच्या कडेला वाढलेले काटेरी झुडपे काढून टाकावे व विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाईटची व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. या भुयारी मार्गा जवळ माती टाकण्यात आली असून पावसाने अचानक हजेरी लावली तर मोठ्या प्रमाणात चिक्खल झाल्यास भाविक भक्तांना पायी चालण्यास अडचणी येणार आहे. तसेच मंदिर परिसरात देखील कोपरगाव नगरपरिषदेने देखील अद्यावत सुविधा उपलब्ध करून द्यावे जेणेकरून भाविक भक्तांची गैरसोय होणार नाही. सध्या मोबाईल व सोनसाखळी खेचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे भाविकांनी देखील सतर्क रहावे असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!