


तालुका काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारचे आभार!!
जेऊर कुंभारी वार्ताहर
गतवर्षी २०२२ मध्ये कोपरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने भरपाई जाहिर केली काही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाले आहे. तर उर्वरित शेतकन्यांना अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसान भरपाईचे यादीमध्ये समावेश करून तातडीने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अशी मागणीला यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सर्व प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचे जाहीर आभार कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आकाश नागरे यांनी तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.
तालुक्यात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ४४ गावांमध्ये शेतातील पिकांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने एकत्रित पंचनामे करून सदरचा अहवाल सदर विभागाने शासनाकडे पाठविण्यात आले. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने भरपाई जाहिर केले काही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाले आहे. तर उर्वरित शेतकन्यांना अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसान भरपाईचे यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही त्या शेतकऱ्यांना देखील समाविष्ट करून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे होते ही सर्व वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव तालुका काँग्रेसच्या वतीने आकाश नागरे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन तालुक्यातील परिस्थिती निदर्शनास आणून दिले त्यावर कृषीमंत्र्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचे आश्वासन दिले व आज कृषीमंत्र्यांनी दिलेले आश्वासन देखील पूर्ण झाले शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिल्या बद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होतं आहे.



