Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकृषी मंत्री अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देणार - आकाश नागरे

कृषी मंत्री अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देणार – आकाश नागरे

जेऊर कुंभारी वार्ताहर

गतवर्षी २०२२ मध्ये कोपरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे; पण कोपरगाव मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे होऊनही अद्याप अतिवृष्टीचे अनुदान वाटप झाले नाही. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाचे वाटप त्वरित करावे केलेल्या मागणीवर अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचे आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले असल्याची कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिली.

तालुक्यात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ४४ गावांमध्ये शेतातील पिकांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने एकत्रित पंचनामे करून सदरचा अहवाल सदर विभागाने शासनाकडे पाठविण्यात आले आहे. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने भरपाई जाहिर केले काही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाले आहे. तर उर्वरित शेतकन्यांना अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसान भरपाईचे यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही त्या शेतकऱ्यांना देखील समाविष्ट करून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असुन जिरायत १३ हजार ६००, बागायत २७ हजार आणि बहुवार्षिक ३६ हजार हेक्टर प्रमाणे कुठलाही भेदभाव न होता अनुदान मिळावी अशी मागणी देखील निवेदनाच्या माध्यमातून कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!