Thursday, April 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedशेतकऱ्यांचे हित लक्षात घेता व्यापारी बांधवांनी कांदा लिलाव बंद ठेवु नये -...

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता व्यापारी बांधवांनी कांदा लिलाव बंद ठेवु नये – मा.सभापती सुनिल देवकर


कोपरगाव प्रतिनिधी

नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनच्या नाशिक जिल्हा मार्केट बंद च्या धर्तीवर कोपरगांव मुख्य मार्केट यार्ड मधील कोपरगांव येथील कांदा व्यापा-यांनी उद्या बुधवार दि.२० सप्टेंबर पासुन कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तरी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता हा निर्णय मागे घ्यावा अशा आशयाचे निवेदन मा.सभापती सुनिल देवकर,अल्लाउद्दीन शेख,यासह इतर शेतकरी बांधववांनी मा.सभापती, उपसभापती,सचिव,कृषि उत्पन्न बाजार समिती,कोपरगांव यांना दिले आहे
या मोसमा मध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे,जमिनीत तर पेरले,परंतु हातात किती पडेल याची शाश्वती नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सध्यस्थितीला त्याची मदार साठवलेल्या कांद्यावर आहे .
ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतक-याच्या हातात दोन पैसे मिळतील हेच ते दिवस आहेत हक्काचे नगदी पिक टोमॅटोनेही मार दिल्याने तोंडचे पाणी पळाले आहे,एकीकडे दुष्काळाचे सावट असतांना सणासुदीच्या तोंडावर बाजार समित्या बंद राहाणार म्हटल्यावर शेतीमाल विक्री करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे तरी या सर्व गोष्टींचा विचार करून व्यापारी बंधु यांनी इतर जिल्हयाचे लोण आपल्या तालुक्यात पसरवून देता रोजच्या दैनंदीन पध्दतीने मार्केट चालु ठेवावे अशी विनंती मा.सभापती सुनिल देवकर,अल्लाउद्दीन शेख,यासह इतर शेतकरी बांधववांनी मा.सभापती उपसभापती सचिव,कृषि उत्पन्न बाजार समिती तसेच व्यापारी बांधवांना आपल्या निवेदनातुन केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!