

जेऊर कुंभारी वार्ताहर
गेल्या तीन महिन्यापासून पावसाचे पाट फिरवली आहे कोपरगाव तालुक्यात खरिपाची पिके सोयाबीन, मका ,कपाशी ही पिके पावसाच्या भरोशावर घेतली आहे पण पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून खाक झाली आहे.जर पाऊस झाला नाहीत पुढील काळात जनावरांना चारा हि उपलब्ध होणार नाही या पाश्र्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर कुंभारी गावातील आमदार आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने ग्रामदैवत गंगेश्वर महादेवाला जलअभिषेक करून साकडे घालण्यात आले.
या वेळी महेंद्र वक्ते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या दुष्काळग्रस्त परीस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी तसेच ई पिक पाहणी करण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत काही शेतकऱ्यांवर जवळ अँड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे ई पिक पाहणी करण्यात अडथळे येत आहे.तसेच पंचनामे वेळेवर जरी झाले पण तोंड पाहून याद्यामध्ये फेरबदल केला जात असल्याचे निर्दशनास येत आहे त्यामुळे गरीब शेतकरी अनुदानापासुन वंचित राहतो.
जे कोणी हा प्रकार करतात त्यांनी असे काही करू नये असे भावनिक आवाहन महेंद्र वक्ते यांनी केले.
यावेळी गौतम बँक संचालक बापुराव वक्ते ,खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक दिलीपराव शिंदे,जेष्ठ कार्यकर्ते पाटीलबा कल्याणराव गुरसळ ,महेंद्र वक्ते ,किरण पाटीलबा वक्ते ,नानासाहेब गुरसळ ,ग्रामपंचायत सदस्य किशोर वक्ते ,राजेंद्र परसैया, कारभारी गांगुर्डे, यश गुरसळ आदी सह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.


