

जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊर कुंभारी येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी येथील अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले यांना शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही फिटला नाही. शासनाने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. सर्व स्तरावर पंचनामे झालीत. मात्र पंचनामे करतांना वशिलेबाजी झाली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान आले मात्र बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांनी तलाठी यांना विचारणा केली असता, आम्ही पंचनामे करून सर्व यादी ग्रामपंचायतकडे पाठवली आहे व त्यांनी
सर्व माहिती तहसीलदार कार्यालयाकडे पाठवली असल्याचे कळवले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी अगोदर पंचनामे करूनही त्यांची नावे दुसऱ्या यादीत आलेली आहेत. त्यामुळे दुसऱ्या यादीतील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यासंदर्भात आपण सखोल माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या संबंधितांच्या कामासंदर्भात चौकशी करून तातडीने कारवाई करावी तसेच जेऊर कुंभारी येथील अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे नाही अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना
माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते ,माजी सरपंच राजेंद्र गिरमे,कल्याणराव गुरसळ, महेंद्र वक्ते,तुषार गुरसळ, सुनिल वक्ते ,राजेंद्र वक्ते,नारायण गुरसळ, शिवाजी वक्ते,आप्पासाहेब वक्ते,मधुकर गुरसळ, तुळशीदास गुरसळ, संजय शांतीलाल वक्ते, मार्तंड जाधव ,भास्कर गायकवाड, किशोर वक्ते,नानासाहेब गुरसळ,
हनुमंतराव मेहेत्रे ,अमोल दौंड, अजिंक्य वक्ते, ,पोपट शिंदे, दौलत वक्ते ,नितीन वक्ते, शिवाजी गुरसळ,किरण आव्हाड, अमित भोंगळे, चांगदेव घुडघे, किरण आव्हाड, शंकर वक्ते, नारायण गुरसळ, बंडू मोकळ, किरण गुरसळ,बाळासाहेब गुरसळ, किरण वक्ते,गिरधर गुरसळ, आदी सह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.


