Friday, April 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले !!- आकाश नागरे

पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले !!- आकाश नागरे

कोपरगांव काँग्रेस कमिटी प्रांगणात तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न!!

कोपरगाव प्रतिनिधी

आज देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोपरगांव काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या प्रांगणात काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री. आकाश नागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले.
माध्यमांसोबत बोलताना नागरे म्हणाले – स्वातंत्र्य दिना निमित्तानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो.
देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून मिळालं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखण्यासाठी गेल्या ७६ वर्षांत भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी बलिदान दिले. या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करुन देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी कटीबद्ध होण्याचा आज दिवस आहे.
देशाच्या स्वातंत्र्योत्तर ७६ वर्षांच्या वाटचालीत देशाचा गौरव वाढवण्यात शेतकरी, कष्टकरी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, व्यापारी, उद्योजक, संशोधक, खेळाडू, कलावंत मंडळी, विद्यार्थी, शिक्षक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते अशा सर्वांचं योगदान आहे. या समस्त देशवासियांची एकजूट, कष्टामुळं, मेहनतीमुळं देश आज अभिमानानं उभा आहे. प्रगती करत आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवून सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी एकत्र येऊन देशाला जागतिक शक्ती बनवण्याचा दृढ निर्धार करुया. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाची लोकशाही मजबूत करुया.
ह्या ध्वजारोहण समारंभास सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वातंत्र्य सैनिक व नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!