
कोपरगाव प्रतिनिधी
साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त कोपरगाव तालुक्यातील क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन आणि विराट प्रतिष्ठान कोपरगाव शाखेच्या वतीने शाखा अध्यक्ष श्री.अनिल भोलेनाथ पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे लाडके गायक रणजित खडांगळे व नानाभाऊ वीर यांचे सुर संगीततमय गायन, लावणी सम्राट किरण कोरे यांचा सदाबहार लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रथमतः डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्या नंतर प्रमुख पाहुणे क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजू कांबळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.रमेश घोडेराव, कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री. राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक श्री.रवींद्र पाठक, श्री.शिवाजी खांडेकर तसेच विराट प्रतिष्ठानचे श्री.निलेश सरोदे, श्री.निलेश जाधव. ॲड.नितीन पोळ शिंगवे येथील सरपंच श्री.प्रशांत काळवाघे, श्री.शरद त्रिभुवन, श्री.पंडित भारुड. श्री.विजुभाऊ दोडके, श्री.भोलेनाथ पगारे, श्री.संजय खैरनार. श्री.रवी सानप, श्री.योगेश जाधव, श्री.विशाल बकुरे, श्री.सुखदेव जाधव, श्री.सुदाम कांबळे, श्री. भागिनाथ कांबळे, श्री. जंगू अण्णा मरसाळे, पोलीस पाटील श्री.संदीप कांबळे, श्री.प्रकाश सोळशे, श्री.विकास अस्वार, श्री.गोपी घोरपडे, श्री.नितीन वाकळे, श्री.महेश पंडोरे, श्री. शुभम रोकडे, श्री.राहुल गुडेकर. श्री.आतिश पगारे, श्री.अनिल कांबळे, श्री.प्रभुदास पाखरे, श्री.प्रदीप गायकवाड, श्री.सुमित पगारे, श्री.संतोष पगारे , श्री.काका पगारे आदी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन, कोपरगाव शाखा अध्यक्ष श्री.अनिल पगारे यांनी केले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन श्री. विवेक कोल्हे, विराट प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.प्रदीप सरोदे यांचे या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.रवी डोलारे, श्री.सचिन साळवे, श्री.मयुर साळवे, श्री.अमोल पगारे. श्री.दावल कांबळे आदींसह क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन आणि विराट प्रतिष्ठान कोपरगाव शाखेचे पदाधिकारी, सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कोपरगाव शहर आणि तालुक्यातील समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्री.गणेश कांबळे यांनी मानले.


