
जेऊर कुंभारी वार्ताहर
अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकनाट्यांमधून जनजागृतीचे कार्य केले होते. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते.पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या व कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे हे ठणकावून सांगताना मानव हा गुलाम नसून जगाचा वास्तव निर्माता आहे असा संदेश दिला. आपल्या प्रभावी साहित्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाज प्रबोधन केले.असे प्रतिपादन आर पी आय चे प्रदेश सचिव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड यांनी केले. जेऊर कुंभारी संजयनगर येथे आर पी आय शाखा व भीम साम्राज्य सेना मित्र मंडळाच्या वतीने आयोजित साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव प्रसंगी ते बोलत होते.जेऊर कुंभारी संजयनगर येथे आरपीआय शाखा व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळ यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केला. आरपीआयचे राज्यसचिव दीपकराव गायकवाड यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सौ पूजा गोकुळ अहिरे व श्री गोकुळ किसन अहिरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे पूजन केले. सदर प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक श्री भास्कर वाकोडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनावर बोलताना त्यांचे विचार सांगत आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भीम साम्राज्य सेना मित्र मंडळाचे संस्थापक व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड यांनी महापुरुषांचे विचार मनामनात रोजावेत व त्यांच्या उपदेशाने मानवी जीवन समृद्ध व्हावे ह्या हेतूने संघटनेमार्फत सर्वच महापुरुषांच्या जयंती साजरी केली जाते असे सांगून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संजय भालेराव,दामोदर गायकवाड,चांगदेव इस्ते, भीमा साळवे, किसन गायकवाड,ज्ञानेश्वर इस्ते, संजय आव्हाड, गोरख चव्हाण,अशोक रंगनाथ इस्ते, लाला गांगुर्डे,आनंदा चव्हाण,दिलीप त्रिभुवन, , जालिंदर इस्ते,किसन आहिरे, भीमसाम्राज्य सेना मित्र मंडळाचे उपाध्यक्ष दावीद धिवर, कार्याध्यक्ष सुमित पगारे,निलेश शिंदे,अवि पगारे, गणेश कोळे, बाळू साळवे, भारत गायकवाड रवी पवार,विक्रम अहिरे, महेश गोरसे, सोमेश्वर गायकवाड, जयसिंग गायकवाड, गणेश गांगुर्डे आदींसह आर पी आय चे व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित पगारे यांनी तर आभार दावीद धिवर यांनी केले.


