





जेऊर कुंभारी वार्ताहर
विधान परिषदेतील आक्रमक आमदार महायुती सरकारचे समन्वयक मा.प्रसाद लाड आज दि.३० जुलै रोजी नगर-शिर्डी दौर्यावर आले असता कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील समुद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर जेऊर कुंभारी व कोकमठाण येथील ग्रामस्थांनी त्यांचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले.
याप्रसंगी आ.प्रसाद लाड यांचा मा.सरपंच रमेश वक्ते, मा.सरपंच यशवंतराव आव्हाड, भाजप प्रदेश पदाधिकारी सिद्धेश दौंड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागतोपर सत्कार केला.
याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने लाड यांना निवेदन देण्यात आले. त्यात समुद्धी महामार्गासाठी येथील ग्रामस्थांनी जेऊर कुंभारी शिवारातील नव्वद टक्के जमीन दिलेली आहे. त्यामुळे या परिसरात असलेल्या टोलनाक्याला जेऊर कुंभारी नाव देण्यात यावे, येथील टोलनाक्यावर स्थानिक ग्रामस्थांना प्राधान्य द्यावे, जे ग्रामस्थ या टोलनाक्यावर काम करतात त्यांचे पगार वेळेवर व्हावेत, जेऊर कुंभारी गावासाठी पर्यटन निधी मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या. त्यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी मी स्थानिक गावकऱ्यांच्या आणि तरुणांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून स्थानिक कार्यकर्त्यांना अधिक बळ देण्याचे काम येणाऱ्या काळात मी करेल महायुती सरकारच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या विभागाला अधिकाधिक लाभ देण्याचा असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र भाजप भटके विमुक्त आघाडीचे सरचिटणीस श्री संतोष आव्हाड यांचे देखील ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले, संजय वक्ते, सतिष पवार, अमोल राऊत, अमोल दौंड, सचिन आव्हाड अनिल दौंड ,देविदास दौंड ,अशोक दौंड ,अरविंद दौंड ,राजेंद्र सांगळे,मा.उपसरपंच कोकमठान वैभव नेरकर ,निखिल राऊत ,अमर गीते ,बाळासाहेब राऊत ,यशवंत वक्ते ,देविदास लोखंडे ,ज्ञानदेव गायकवाड ,अर्जुन मरसाळे ,मयुर रिळ ,राहुल थोरात ,मनोज कदम ,संतोष मरसाळे ,आकाश आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


