
कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका, ऊस, कांदा तसेच कपाशी व इतर सर्व पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते त्या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने १० ऑगस्ट २०२२ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून नुकसान भरपाई मिळावी यासाठी निर्णय घेतला व पंचनामा करण्याचे आदेश दिले.त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने ८ सप्टेंबर २०२२ रोजी निर्णय घेण्यात आला व प्रसारित करण्यात आला (सी.एल. एस. २०२२/प्र.क्र.२९७/म-३) नुसार 507॥ नुसार देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषामध्ये बदल करून त्यात वाढ करण्यात आली. त्यामुळे सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा निर्माण झाली होती.
त्याप्रमाणेकोपरगाव तालुक्यातही पंचनामे झाले व त्याचा रिपोर्ट महसूल विभागामार्फत राज्य सरकारला सदर करण्यात आलेला आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील एकूण ५ मंडळापैकी २ मंडळातील शेतकऱ्यांना मदत मिळाली असून अध्यापही ३ मंडळातील गावातील नुकसानग्रस्त शेतकरी जवळपास वर्ष होत आले तरी
आर्थिक मदतीपासून वंचित त्यामुळे तत्काळ या उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कोपरगांव शेतकरी कृती समिती आज दि. ३१ जुलै २०२३ पासून तहसील कार्यालसमोर अमरण उपोषण करणार आहे.
या आंदोलनाला कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने सहभागी होणार असल्याची माहिती कोपरगांव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिली.


