Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुरूपौर्णिमेनिमित्त बिपीनदादा कोल्हे यांनी घेतले राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन!!

गुरूपौर्णिमेनिमित्त बिपीनदादा कोल्हे यांनी घेतले राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन!!

कोपरगाव प्रतिनिधी

मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराजांचे संत पूजन करून भाविकांसमवेत घेतला महाप्रसाद
कोपरगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोपरगाव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिरात आज ३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सव पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात अनेक साधू-संतांच्या व भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरूपौर्णिमेनिमित्त संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी स्थानावर जाऊन मनोभावे दर्शन घेतले व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज यांचे संत पूजन केले. तसेच बिपीनदादा कोल्हे यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व भाविक-भक्तांना गुरूपौर्णिमा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कोपरगाव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी स्थान आणि श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिरात आज गुरूपौर्णिमेच्या दिवशी पहाटे ४ वाजता संत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या मूर्तीला व समाधीला पंचामृताने मंगल स्नान, महापूजा, ५ वाजता नित्यनियम विधी, सकाळी ७ वाजता सत्संग प्रवचन, ८ वाजता संत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या पादुकांची पूजा, मूर्तीची षोडशोपचार महापूजा करण्यात आली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आज गुरूपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीसमोर नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले. तसेच राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज यांचे संत पूजन करून आशीर्वाद घेतले.
गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी स्थान आश्रम ट्रस्टच्या भक्त निवासमध्ये संत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे पाद्यपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे पौरोहित्य शिखरे गुरु व ब्रह्मवृंदाने केले. पाद्यपूजेनंतर सकाळी १० वाजता मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज, मधुगिरी महाराज, शिवभक्त भाऊ पाटील महाराज (त्र्यंबकेश्वर) यांनी आपल्या सुमधुर प्रवचनात गुरूपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन सार्थकी लागत असते. त्यामुळे आपल्या जीवनात गुरूला अतिशय महत्व आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस ‘गुरू पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या भक्तिभावाने गुरूची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांनी प्रत्येकाने आपल्या जीवनात गुरू केलाच पाहिजे, असे सांगून सुखी जीवन जगण्यासाठी भक्तांना मोलाचा उपदेश केलेला आहे. प्रत्येकाने त्यांची शिकवण आचरणात आणली पाहिजे, असे प.पू. रमेशगिरीजी महाराजांनी प्रवचनातून सांगितले.
तद्नंतर आरती झाली आणि नंतर महाप्रसाद म्हणून ४१ क्विंटल बुंदी व ४१ क्विंटल मसाला भाताचे वाटप उपस्थित भाविक-भक्तांना करण्यात आले. बिपीनदादा कोल्हे यांनी उपस्थित सर्व भाविक-भक्तांना गुरूपौर्णिमा उत्सवाच्या शुभेच्छा देऊन भाविकांसोबत संतगणांच्या प्रवचनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी प.पू. माधवगिरी महाराज, दत्तगिरी महाराज, भोलेगिरी महाराज, श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, ज्ञानगिरी महाराज, परशरामगिरी महाराज, गुलाबगिरी महाराज, संदीपगिरी महाराज, संतोषगिरी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी स्थान आणि श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलासराव कोते, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्त अनिल जाधव, रामकृष्ण कोकाटे, शिवनाथ शिंदे, आशुतोष पानगव्हाणे, संदीप चव्हाण, अतुल शिंदे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक सतीश आव्हाड, माजी उपाध्यक्ष अरुणकाका येवले, भीमा संवत्सरकर आदींसह बाबाजींचे हजारो भक्त उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!