Wednesday, April 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedबिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार!! जेऊर कुंभारी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी!!- खादी ग्राम...

बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार!! जेऊर कुंभारी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी!!- खादी ग्राम उद्योग संघाच्या संचालक दादासाहेब चव्हाण

जेऊर कुंभारी वार्ताहर

कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून जेऊर कुंभारी चांदेकसारे, घारी आदी करून गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
दि २७ जून २०२३ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जेऊर कुंभारी येथील शेतकरी सुनिल लाहनु चव्हाण यांच्या गोठ्यात बांधलेल्या बोकडावर या बिबट्यानाने हल्ला करून बोकड ठार केला आहे. अंदाजे आठ ते नऊ
हजार रूपये किंमतीचा विक्रीला आलेला बोकड ठार झाल्यामुळे सुनिल चव्हाण या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेने जेऊर कुंभारी परिसरातील चव्हाण वस्तीवर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाकडून या बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याने जेऊर कुंभारी येथील सरपंच सुवर्णा पवार,जेऊर कुंभारी सोसायटीचे अध्यक्ष,खादीग्राम उद्योगाचे संचालक दादासाहेब चव्हाण
नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वन विभागाला वारंवार कळवून देखील बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश येत आहे. फक्त वेगवेगळी कारणे देऊन चालढकल करण्यात वनविभागाचे अधिकारी धन्यता मानत आहेत तर याचा काय उपयोग असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तसेच मानवी जीवाला पण भीती निर्माण झाली आहे. शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून मारून खात असल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

या संदर्भात त्यांनी वनविभाग अधिकारी श्रीमती सोनवणे यांना कळवले असल्याचे समजते आहे. वन विभागाने आता कारणे न देता बिबट्याचा बंदोबस्त वेळीच करणे गरजेचे असल्याचे मत जेऊर कुंभारी सोसायटीचे अध्यक्ष,खादीग्राम उद्योगाचे संचालक दादासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!