Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रामाणिकता व कर्तव्यनिष्ठेतून मिळवलेला लौकिक हीच जीवनाची अनमोल संपत्ती!!- दिपकराव गायकवाड

प्रामाणिकता व कर्तव्यनिष्ठेतून मिळवलेला लौकिक हीच जीवनाची अनमोल संपत्ती!!- दिपकराव गायकवाड

जेऊर कुंभारी वार्ताहार

आपल्या कार्याप्रती प्रामाणिक राहून निष्ठेने आपले कार्य करत राहणे हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असून प्रामाणिकता व कर्तव्यनिष्ठेतून मिळवलेला लौकिक हीच जीवनाची अनमोल संपत्ती असते असे प्रतिपादन आरपीआयचे राज्य सचिव दिपकराव गायकवाड यांनी व्यक्त केले. जेऊर कुंभारी येथील लेखापरीक्षक भास्कर वाकोडे यांना नुकताच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक फाऊंडेशन यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज आदर्श लेखापरीक्षक पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने आर पी आय शाखा व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी बोलतांना दिपकराव गायकवाड पुढे म्हणाले की,भास्करराव वाकोडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन लेखापरीक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून त्यांना मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव असून त्यांचे कार्य अभिमानास्पद असल्याचे सांगत त्यांना आर पी आय चे वतीने भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन वाकोडे यांचा सत्कार केला. सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तथा भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे संस्थापक प्रदिप गायकवाड,माजी ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ मोहिते,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते,किरण खांडेकर यांनी आपल्या मनोगतातून वाकोडे यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना वाकोडे यांनी आपल्या मनोगतातून युवकांना मार्गदर्शन करतांना आपण ज्या कोणत्या क्षेत्रात काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण स्वतःला झोकून देऊन आपले काम प्रमाणिक पणे पार पाडले तर निश्चितच यशही मिळते आणि आपले कौतुकही होते असा सल्ला दिला.आणि भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे सत्कार समारंभ आयोजित केले बद्दल आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे संस्थापक प्रदिप गायकवाड,कार्याध्यक्ष सुमित पगारे, उपाध्यक्ष निलेश शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक किसन गायकवाड, संजय भालेराव,सोपान खरात, सोमनाथ वरशीळ, बंडू चव्हाण सुधाकर दिवे, चांगदेव गायकवाड यांचेसह सचिन गायकवाड, राहुल गोरसे,पप्पू गायकवाड, आकाश साळवे, राहुल जगताप, सुनिल चव्हाण,संतोष चव्हाण, भारत गायकवाड वआर पी आय शाखा जेऊर कुंभारी, भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुमित पगारे यांनी केले तर पप्पु गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!