

जेऊर कुंभारी वार्ताहर
शैक्षणिक दीपस्तंभ व अक्षरधन पब्लिकेशनच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जन रोजी शैक्षणिक दीपस्तंभ पर्यावरण विशेषांक २०२३ प्रकाशित करण्यात आला.
पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन व प्रमाण पत्र वितरण मा. बादल बेले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. विजय जांभुळकर अध्यक्ष नागपूर विभाग नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत ‘ प्रा.डॉ. विद्या ठवकर – भंडारा, मा. मिलिंग पगारे सेवानिवृत्त आय टी इंजिनिअर – नाशिक, सौ प्रतिभा साळुंके प्रकाशक अक्षरधन पब्लिकेशन, साहित्यिक व शैक्षणिक दीपस्तंभची संपूर्ण संपादकीय टीम उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व नियोजन सह संपादिका – करुणा गावंडे जांभुळकर – चंद्रपूर यांनी केले, तर प्रास्ताविक – वर्षा सांगवीकर – लातूर यांनी केले. मान्यवरांचा परिचय रेखा शिंदे – संभाजी नगर यांनी केला तर उपस्थितांचे स्वागत जया कुलथे – अहमदनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रामेश्वरी सुतार यांनी स्वागत गीत गायन केले तर वैशाली टिचकुले यांनी पर्यावरणावर आधारित अंभगाचे गायन केले.
पर्यावरण, मानवी जीवन अत्यंत मोलाची बाब आहे सर्वांनी पर्यावरणाची महती व पर्यावरणाशी असलेले मानवी नाते हे जपायला हवं. पर्यावरण विशेषांक अतिशय सुंदर असून त्यातील अंतरंग काव्य, लेख समाजाला उपयुक्त आहेत असे विचार मांडून हा विशेषांक वनमंत्री यांच्यापर्यंत पोहचण्याची व दखल घेण्याची माझी जवाबदारी असे अध्यक्षीय भाषणातून मा.बादल बेले यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी मा मिलिंद पगारे यांनी टाकावू मधुन टिकाऊ वस्तू तयार करणे याबद्दल रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या इतरत्र फेकून न देता सजीवसृष्टीस प्रदुषणापासून वाचविणे हा मोलाचा संदेश देत सुंदर सुशोभित वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी करुन दाखविले आणि मार्गदर्शन केले.
पर्यावरण जपाआरोग्य नीट ठेवा असे या प्रकाशन कार्यक्रम निमित्ताने मा विजय जांभुळकर यांनी सूचित केले.
आपले संत – महात्मे यांनी आधीच पर्यावरणाचे मानवाशी असलेले नाते स्पष्ट केले आहे. ते नाते आपण जतन करावे . निसर्गाचे संवर्धन करून सृष्टीमधील जैवविविधता जोपासली गेली पाहिजे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी प्रा डॉ विद्या ठवकर यांनी केले.
संपादकीय मनोगतातून सुदाम साळुंके यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे व त्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण महत्व जाणून घेणे गरजेचे आहे. या विशेषाकांचा फायदा नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यात संपूर्ण टीम ने अतिशय मेहनत घेतली असे संपादकीय मनोगत मा सुदाम साळुंके यांनी व्यक्त केले.
या वेळी उपस्थित साहित्यिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशेषांक निर्मिती मध्ये शैक्षणिक दीपस्तंभच्या संपूर्ण टिमने मेहनत घेतली. कार्यकारी संपादक नवनाथ सुर्यवंशी व सह संपादक ज्ञानेश्वर सैंदाने यांनी निर्मितीमध्ये आपले योगदान दिले. कार्यक्रमात शेवटी मान्यवरांचे आभार- रुपाली गोजवडकर – नांदेड यांनी मानले.
सर्वांच्या सहकार्याने शैक्षणिक दीपस्तंभ पर्यावरण विशेषांक प्रकाशन सोहळा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि यशस्वीपणे पार पडला.


