Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedहॅरीसन ब्रँच चारी वरील अवलंबीत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार का- माजी सभापती शिवाजीराव...

हॅरीसन ब्रँच चारी वरील अवलंबीत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार का- माजी सभापती शिवाजीराव वक्ते

जेऊर कुंभारी वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी, चांदेकसारे ,कोकमठाण,डाऊच खुर्द
हा भाग हॅरीसन ब्रँच चारीतुन शेतीला नियमित पाणी मिळाल्या मूळे, हा भाग आर्थिकदृष्टया सधन म्हणून ओळखला जात होता परंतु पाटबंधारे विभागाला या शेतकऱ्यांची झालेली भरभराट पाहावेना शी झाली कि काय म्हणुन मागील काही वर्षापासून हॅरीसन ब्रँच चारीला सोडण्यात येणाऱ्या पाण्यात अनियमतता दिसून आली परंतु आता तर कळसच झाला.
गोदावरी कालवा पूर्ण क्षमतेने वाहत असूनह मिनी कालवा म्हणून ओळख असलेली ही चारी सध्या कोरडी ठाक पडलेली आहे, शेतकरी तहानलेला आहे.परंतु माय -बाप पाटबंधारे विभागाला या गोष्टीचे काही देणे घेणे नाही कॅलिफोर्नियाचे वाळवंट होत आहे हि बाब चिंताजनक आहे.परंतु या मुळे शेतकऱ्यांमध्ये पाटबंधाराच्या विरोधात नाराजी तर आहेच. परंतू त्याचे रुपांतर आता असंतोषात होत आहे, त्याने जर उग्र रूप धारण केले तर त्याची धग दिल्ली पर्यत जाऊ शकते, कोपरगाव तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींही देखील हॅरीसन ब्रॅच चारीला वेळेवर सोडावे यासाठी वेळोवेळी आंदोलने, उपोषणे केली आहेत
माजी मंत्री स्व.शंकराव कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या अगोदर झगडे फाटा परिसरात रास्ता रोको करून संबंधीत विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता.तेव्हा काही अंशी पाटबंधारे विभाग जाग्यावर आला परंतु.काही काळानंतर पुन्हा “पहीले पाढे पंचावन्न “असे या चारीच्या बाबतीत दिसून आले आहे.
वर्तमान परीस्थितीत चांदेकसारे, जेऊर कुंभारी सह इतर गावे, हॅरीसन बँचचारीकडे डोळे लावुन बसले आहे,रब्बीचे आवर्तन वेळेवर न मिळाल्यामुळे गहु, कांदा पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे.त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामूळे, पाण्याअभावी फळबागा,व जनावरांचा चारा वाचवणे, जिकरीचे होऊन बसलेआहे परंतु पाटबंधारे विभागाकडून अजूनही ही चारी सुटत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे ,पूर्वी गोदावरी कालव्याचे पाणी चितळीला पोहचले कि दोन तिन दिवसात पाणी सुटत होते परंतु तेही दिवस आता राहीले नाही,पाटबंधारे विभागाकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचा छळ केला जातो कि काय अशी शंका येते आहे
अगोदर नैसर्गिक आपत्ती आणी आता पाटबंधारे विभाग या दोन्हींच्यामध्ये शेतकरी पिसला जात आहे,अशीच परिस्थिती जर राहीली तर शेतकरी कर्जबाजारी होणार आहे, पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी देशोधडीला लागल्या शिवाय रहाणार नाही असे संताप जनक वक्तव्य माजी सभापती शिवाजीराव वक्ते यांनी दिलेल्या प्रसिध्ही पत्रकात केले आहे,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!