
जेऊर कुंभारी वार्ताहर
दिनांक २८ मे रोजी शिर्डी साकुरीसाकुरी येथील गोदावरी वसाहतीतील कांदा मार्केट मैदान येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय समाज कल्याण न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राष्ट्रीय आणि राज्य कमिटीचे नेते तसेच जिल्ह्यातील आजी-माजी आमदार खासदार, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरपीआयचे अधिवेशन पार पडणार असून सदर अधिवेशनासाठी राज्यभरातून तसेच जिल्ह्यातून लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून हे अधिवेशन राज्यामध्ये प्रभावी ठरेल असे प्रतिपादन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सचिव दिपकराव गायकवाड होते. यावेळी संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी बैठकीला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या प्रशंसनीय असून भविष्यात कोपरगाव तालुक्यामध्ये आरपीआयला चांगले दिवस येणार असून भविष्यामध्ये नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुका आरपीआयचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल असे मत व्यक्त केले. राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी बैठकीला संबोधित करताना अधिवेशनाची रूपरेषा आणि त्या संदर्भातील नियोजन याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. विभागीय जिल्हाप्रमुख भीमा भाऊ बागुल यांनी चलो शिर्डी असा नारा देताना अधिवेशना संदर्भात वातावरण निर्मिती करण्यासाठी तालुक्यामध्ये चलो शिर्डी अशा घोषणांचे फ्लेक्स बोर्ड लावावे व ग्रामीण भागामधील कार्यकर्त्यांशी संवाद साधून मोठ्या संख्येने अधिवेशनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात राज्य सचिव दिपकराव गायकवाड म्हणाले की, संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, विभागीय जिल्हाप्रमुख भिमाराज बागुल हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जिल्हाभर आढावा बैठका घेत घेत असून संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव हे मुंबई वरून येऊन महिनाभर अगोदर जिल्ह्यामध्ये झंझावाती दौरा करून कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोपरगाव तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने अधिवेशनासाठी कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन तालुका कमिटीच्या वतीने करण्यात यावे अशी सूचना केली. दरम्यान तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांनी आलेल्या मान्यवरांचे तालुक्याच्या वतीने स्वागत केले. व कोपरगाव तालुक्यातून अधिवेशनासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी ग्वाही दिली. या बैठकीसाठी तालुका सल्लागार सोमनाथ लोहकरे, शहराध्यक्ष रामदास कोपरे, तालुका उपाध्यक्ष फकीरा चंदनशिव, अविनाश मोरे, शहर उपाध्यक्ष अनिसभाई शेख, संघटक किशोर मैंद, शहर उपसंघटक अमोल थोरात, ज्येष्ठ नेते दिलीप पगारे,मनोज सांबळे, चंदू नाना जगताप, महिला जिल्हा उपाध्यक्ष वैशालीताई सोनवणे, शोभाताई खंडीझोड, विलास साळवे, सत्यजित कोळगे,सोमनाथ पडवळ, राहुल खंडिझोड, अक्षय रगडे, राहुल भिवसने, भाऊसाहेब गायकवाड, सुनील पवार,संतोष दहिटे,अक्षय उगले, अमोल भारुड,अल्तमश अत्तार, राहुल गायकवाड,मंगेश मोरे,सुमित पगारे,सुयोग मोरे,सागर गायकवाड, दीपक मोरे, सतीश पगारे, शुभम भालेराव, मनोज बोर्डे,रवी पवार, पप्पू गायकवाड, अजय गोरसे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कार्याध्यक्ष बाबबासाहेब भारुड, प्रास्ताविक युवा नेते प्रदीप गायकवाड यांनी केले तर कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी अल्पोपहाराचा कार्यक्रम होऊन बैठकीची सांगता करण्यात आली.


