
कोपरगाव प्रतिनिधी
संपूर्ण जगाला आकर्षित करणारे तत्व म्हणजे श्रीकृष्ण .श्रीकृष्ण परमात्मा ब्रह्मदेवाला कळले नाही तर आपल्याला काय कळणार.
जेव्हां जेव्हां या भूमीवर अधर्म वाढतो तेव्हां धर्माच्या रक्षणासाठी भगवंताला जन्म घ्यावा लागतो असे प्रतिपादन ह भ प सुदाम महाराज यांनी केले आहे.
तालुक्यातील भोजडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी ते बोलत होते.
जीव आणि ब्रम्ह यांचे ऐक्य म्हणजेच काला ,जो दुसऱ्याला आनंद देतो नंद,यश प्रदान करणारी वृत्ती म्हणजेच यशोदा .भगवान श्रीकृष्ण यांनी गोकुळात केलेल्या लीलांचे वर्णन फारच खोडकर आहे ते आचरणात आणण्यासाठी नसून फक्त उच्चरण्यासाठी आहे .त्यांचा लीला ह्या मानवाच्या आकलनशक्ती च्या पलीकडे आहे .गोकुळात भगवान श्रीकृष्ण आणि सवंगडी यांनी दुपारच्या वेळी एकत्र येऊन आपल्या शिदोऱ्या एकमेकांना खाऊ घातल्या तो काला आजही कलियुगात चालू आहे.काळाप्रमाणे साधन ही बदलत जातात.कृत युगात ध्यानाला महत्व होते,त्रेतायुगात यज्ञाचे ,द्वापारयुगामध्ये पूजा पाठ तर कलियुगात भजन ,कीर्तन, नामस्मरनाला महत्व आहे. भगवंतांनी अनेक अवतार धारण केले परंतु त्यानां काला करता आला नाही. श्रीकृष्ण जन्मात आपल्या सवंगड्या सोबतच काला केला. आपले चित्त शुद्ध करण्यासाठी परमेश्वराचे चिंतन हाच उपाय आहे असे यावेळी त्यानी सांगितले.
सदर प्रसंगी नकुल महाराज जाधव ,संदीप महाराज ,सचिन महाराज तोडमल आदींनी संगीत साथ दिली. यावेळी ह भ प परशुराम महाराज, अनर्थे, भागवत कथाकार प्रतिक्षताई जाधव,गाडीवान महाराज,पत्रकार जनार्दन जगताप,सुनील काजळे यांचे सह परिसरातील कान्हेगाव, धोत्रे,लौकि,तळेगाव, वारी,संवत्सर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


