
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे दि २६ एप्रिल रोजी १५ वा वित्त आयोग २०२३- २४ चा विकास आराखडा मंजूरी साठी बोलावलेली ग्रामसभा विविध मुद्द्यावर वादळी ठरल्याचे दिसून आले.
सरपंच सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या ग्रामसभेत ग्रामसेवक के.बी. रणछोड यांनी बंदिस्त निधीसाठी ६० टक्के व अबंधित निधीसाठी ४० टक्के असे एकूण जवळपास ३० लाखाचा विकास आराखडा मांडला. स्वच्छता पाणीपुरवठा या गोष्टीची बंदिस्त निधी मधून तर शाळेसाठी वीजपुरवठा, बेंच खरेदी करणे, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, अंगणवाडीसाठी वीजपुरवठा, बायोमेट्रिक व प्रशासकीय खर्च तसेच पुतळा परिसर सुशोभीकरण व ग्राम सुरक्षा यंत्रणा आदी कामासाठी अबंधित निधीतून तरतूद करण्याचे प्रस्तावित केले.
परंतु महेंद्र वक्ते व कल्याण गुरसळ यांनी एलईडी बल्ब साठी खर्च केलेल्या निधी विषयी विचारणा केल्यावर ग्रामसेवक निरुत्तर झाले व त्यांना त्याचा काहीच खुलासा देता येईना कारण एकूण खर्चीत निधी २ लाख ५ हजाराचा असताना ३० बल्प बसवण्याचे प्रस्तावित होते मात्र प्रत्यक्षात बसवलेले बल्प हे फक्त दिड लाखाचे होतात मग उर्वरित पैसे गेले कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महिला ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार केली त्यावर पाण्याचा टीडीएस जास्त असल्यामुळे गटविकास अधिकारी यांनी सदर प्लॅंट बंद ठेवावा अशी सूचना केल्याचे ग्रामसेवक यांनी उत्तर दिल्यामुळे महिला ग्रामसेवक सह सर्वच नागरीक आक्रमक झाले व आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आम्हाला बाहेरून पाणी विकत घेऊन प्यावे लागते असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यावर एकमताने गटविकास अधिकारी यांना ठराव देऊन प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घालण्याचे ठरले.
तसेच १५ व्या वित्त आयोगातून केलेला अंतर्गत रस्ता सुगंधा जगतात यांच्याकडे अतिक्रमण झाल्यामुळे त्यांच्या वतीने त्यांचे बंधू भानुदास वक्ते यांनी ग्रामसेवक यांना जाब विचारला व आराखड्या प्रमाणे रस्त्याची कामे का केली जात नाही व नागरिकांच्या खाजगी मालमत्तेतून आपण रस्ते कुणाच्या आदेशाने तयार करत आहात असा सवाल उपस्थित करून त्वरित अतिक्रमण काढण्याचे त्यांना सांगण्यात आले. पाणीपुरवठा करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार नादुरुस्त झाल्यानंतर तिला पर्यायी व्यवस्था म्हणून एक जादा इलेक्ट्रिक मोटार खरेदी करावी व जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीमध्ये समृद्धी महामार्गाच्या असणाऱ्या टोल प्लाझा ला जेऊर कुंभारी गावचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गायकवाड यांनी केली व सर्व नागरिकांनी त्यास मंजुरी दिली तसेच हे काम लवकरात लवकर झाले नाही तर साखळी उपोषण करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला.
शेवटी सरपंच यांना सभा आटोपती घ्यावी लागली.
सदर ग्रामसभेस सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड,माजी संचालक मधुकर वक्ते,
आर पी आय प्रदेश सचिव दिपक गायकवाड, गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, कृषी सहाय्यक प्रतिभा सोनवणे, कामगार तलाठी ठेंगडे, कल्याण गुरसळ, महेंद्र वक्ते ,भानुदास वक्ते, तुषार गुरसळ, नानासाहेब गुरसळ, संदेश भोंगळे
विजय लकारे, राणा वक्ते, प्रितम गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य किशोर वक्ते, प्रदीप गायकवाड, जालिंदर चव्हाण, मंदा लकारे रत्ना लकारे, वंदना देवकर, अंगणवाडी सेविका सुनिता दिवे, अशा सेविका सुनीता वक्ते, कविता गायकवाड, श्रीमती पठारे आदी सह महिला व ग्रामपंचायत कर्मचारी आनंद बारसे, संगीता वक्ते,संतोष बोरावके, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


