

जीवनात कोणतेही काम एकनिष्ठ होऊन करावे यश निश्चितच मिळणार,अपयश हे दुसरे तिसरे काही नसून ते फक्त यशासाठी केलेले अपूर्ण प्रयत्न असतात असे प्रतिपादन कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव तालुक्यात सोनेवाडी येथे ग्रामस्थांची वतीने
गौतम बँकेचे नूतन उपाध्यक्ष बापूराव जावळे तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झालेल्या सीमा जावळे वआरोग्य विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशा सेविका आशा फटांगरे यांना नुकताच पुरस्कार मिळाला त्याबद्दल या सर्वांचा नागरी सत्कार महंत रमेश गिरी महाराज ,कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी अध्यक्षिय भाषणात बोलताना केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख महंत रमेश गिरी महाराज होते.
यावेळी पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ नितीन बडदे, गौतम सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूराव घेमूड,प्रशासकीय अधिकारी पावडे,उपव्यवस्थापक आबासाहेब जावळे,तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र गुडघे,सरपंच शकुंतला गुडघे,उपसरपंच संजय गुडघे,पत्रकार किसन पवार, मार्गदर्शक निरंजन गुडघे, बाबासाहेब फटांगरे,पुंजाभाऊ जावळे,निरंजन जावळे,संदीप गुडघे,विश्वनाथ जावळे, आहीलाजी जावळे,शिवाजी जावळे,दिंगबर जावळे,विष्णू होन शिवाजी जावळे, कल्याण जावळे, पारसनाथ आहेर,धर्मा जावळे, केशव जावळे,गीताराम जावळे, राजेंद्र होन,तुकाराम गुडघे,डॉ बापूराव जावळे,मधुकर जावळे, विठ्ठल जावळे,कैलास गुडघे, आदीसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वासुदेव देसले पुढे म्हणाले की लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे ही गावासाठी अतिशय भूषणावह गोष्ट असून यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते त्यातूनच त्यांचा सन्मान करणे हे देखील गावाचे कर्तव्यच आहे,वित्त आयोगातून गावचा विकास आराखडा तयार करताना त्यात अभ्यासिकेचा समावेश करावा असा मौलिक सल्ला देखील पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी यावेळी दिला
या प्रसंगी नवनिर्वाचित उपाध्यक्ष बापूराव जावळे कृषी अधिकारी सीमा जावळे व आशा सेविका अशा फटांगरे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब फटांगरे यांनी केले तर शेवटी शिवाजी जावळे यांनी आभार प्रदर्शन केले.


