

कोपरगाव प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान फार मोलाचे आहे. त्यांनी जाती प्रथा, ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व, स्त्रियांचे शोषण, शेतकरी-कष्टकरी यांची पिळवणूक, सांस्कृतिक गुलामगिरी या सर्व आघाड्यांवर संघर्ष केला. महाराष्ट्राला अनेक समाजसुधारक, तत्ववेत्ते, विचारवंत लाभले. यामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान फार मोलाचे आहे.असे प्रतिपादन गौतम बँकेचे नवनिर्वाचित संचालक बापुराव वक्ते यांनी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजीत कार्यक्रमात बोलतांना केले.महात्मा फुले यांचा इतिहास सांगताना ते पुढे म्हणाले की, दलित,शोषित व मागास वर्गाला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.शिक्षणाने समाज प्रगल्भ होतो व राष्ट्र निर्मितीस व विकासाला त्याने चालना मिळते. त्याचप्रमाणे शेतकरी व कष्टक-यांच्या समस्या जाणून त्यावर योग्य उपाययोजना करण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला.
कार्यक्रमचे अध्यक्ष स्थानी गौतम बँकेचे नवनिर्वाचित संचालक बापुराव वक्ते होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्या झाली.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शाळेतील शिक्षिका श्रीम.वंदना पर्वत मॅडम यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला.
या कार्यक्रमात प्रसंगी पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, तलाठी विनोद ठेंगडे,ग्रामसेवक कें.,बी.रणछोड, महेंद्र वक्ते, कैलास खाटाणे,शिवाजी वक्ते, किरण पाटीलबा वक्ते,नानासाहेब गुरसळ,गणेश लिंभुरे, सोईनाथ वायकर, अंगणवाडी सेविका सुनिता दिवे,व लिलाबाई वक्ते, मंदाताई परसैय्या आदी उपस्थित होते.
सुत्रसंचलन श्रीकांत साळवे सर यांनी केले तर आभार शाळाव्यवस्थापन समितिचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य किशोर वक्ते यांनी मानले.


