Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedआ. आशुतोष काळेंमुळे शहरविकासाला चालना!!- सुनील गंगुले

आ. आशुतोष काळेंमुळे शहरविकासाला चालना!!- सुनील गंगुले

कोपरगाव प्रतिनिधी

विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांचा विश्वास सार्थ ठरवून दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीमुळे कोपरगाव शहरातील विकासाचे प्रश्न सुटले असून आ.आशुतोष काळेंमुळे कोपरगाव शहराच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे. कोपरगाव शहराचा रेंगाळलेला पाणी प्रश्न आणि सर्वच प्रमुख रस्त्यांची झालेली धूळधाण यामुळे कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत मागे पडले होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आ. आशुतोष काळे यांनी शहरातील जनतेला आश्वासित करून विकासाचे दाखविले स्वप्न सत्यात उतरविले आहे.कोपरगाव तालुक्यातील विविध गावातून कोपरगाव शहरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे ते परत कोपरगाव शहरात फिरकत नव्हते व खरेदीसाठी दुसरा पर्याय निवडत होते. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम कोपरगाव शहराच्या बाजारपेठेवर होवून बाजार पेठेतील आर्थिक उलाढाल थंडावली होती. त्यामुळे शहराचा पाणी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.त्यामुळे निवडून येताच आ.आशुतोष काळे यांनी सर्व प्रथम पाणी प्रश्न हाती घेवून पहिल्या तीनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाच्या कामाचा प्रश्न मार्गी लावतांना १३१.२४ कोटी निधी दिला आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न देखील त्यांनी सोडविला असून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे तसेच शहर सुशोभीकरणाचे देखील काम प्रगतीपथावर आहे. त्यांनी ५ नंबर साठवण तलाव १३१.२४ कोटी व शहरासाठी १८ कोटी निधी दिला आहे. या निधीतून कोपरगाव शहराच्या विकासाला चालना देवून आ. आशुतोष काळे यांनी खऱ्या अर्थाने कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यामुळे ज्यांनी चार वर्षापूर्वी पाहिलेलं कोपरगाव शहर हेच आहे का? यावर त्यांचा विश्वास बसत नाही. एवढा विकासासाच्या बाबतीत बदल आ.आशुतोष काळे यांच्या साडे तीन वर्षातील प्रामाणिक प्रयत्नांमुळे कोपरगाव शहराचा झाला आहे.कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांच्या जवळपास ११ कोटीच्या कामाच्या निविदा नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. या निधीतून कोपरगाव शहरातील सर्वच प्रभागातील रस्त्यांची कामे होणार असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!