


जेऊर कुंभारी वार्ताहर
जगातला कोणताच आनंद निरंतर नसतो अध्यात्माशी जोडलेल्या माणसांना मात्र निरंतर आनंद मिळत असतो बाह्य जगातला आनंद फक्त भास आहे आणि अध्यात्म सेवेतील आनंद निरंतर आनंद असतो.
असे प्रतिपादन बाळू महाराज गिरगावकर यांनी कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी गावातील जय बजरंग तरूण मंडळ आयोजित हनुमान जयंतीच्या जन्मोत्सव निमीत्ताने बोलत होते.
बाळू गिरगावकर महाराज पुढे म्हणाले की मनुष्य प्राण्यावर पाच प्रकारचे ऋण असतात यामध्ये देव ऋण, ग्रंथ ऋण, संतांचे ऋण, भूत ऋण आणि आई वडील यांचे ऋण आहेत. मधमाशीचे जर इतके उपकार असेल तर या प्राणीमात्रांचे या जीवसृष्टीचे आपल्यावर किती उपकार आहेत याचा विचार मनुष्य प्राण्यांनी केला पाहिजे
भगवद्गीते मध्ये त्यागात शांती आहे असे सांगितले आहे
“धन्य अंजनीचा सुत | नाव त्याचे हनुमंत| ज्याने सीता शोध केली | राम सीता भेटवली ||” || या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपल्या ओघवत्या व रसाळ वाणीतून उपस्थित जनसमुदायाला अत्यंत अनमोल असे मार्गदर्शन केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.


