Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजप सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न!! - आकाश नागरे

भाजप सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न!! – आकाश नागरे

जेऊर कुंभारी वार्ताहर

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात समर्थ राज्यघटना असून सध्या घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली होत आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही महत्त्वाचे असून भाजप सरकारकडून मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा लोकशाहीला मोठा धोका आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी असलेल्या काँग्रेसच्या जनआंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन कोपरगांव तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी कोपरगांव येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते डाॕ. एकनाथ गोंदकर , काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश नागरे, काँग्रेस शहरध्यक्ष तुषार पोटे, काँग्रेस  तालुका सचिव रविंद्र साबळे यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.  
अहमदनगर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते डाॕ. एकनाथ गोंदकर बोलतांना म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान उत्तर देत नाहीत. तातडीने त्यांचे निवासस्थान खाली करून घेतले जात आहे. खासदारकी रद्द केली जात आहे. ही वाटचाल हुकूमशाही कडे आहे. हे  रोखण्यासाठी व देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने देश,जिल्हा, तालुका, आणि गाव पातळीवर जन आंदोलनेत उभारण्यात येणार आहे. सत्याग्रही मार्गाने सर्व आंदोलन होणार असून देशाच्या हितासाठी सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी घ्या असे आवाहन डाॕ. गोंदकर यांनी केले.
तालुकाध्यक्ष आकाश नागरे बोलतांना म्हणाले की, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआय सह केंद्रीययंत्रणांचा वापर केला जात आहे. मात्र काँग्रेस पक्ष हा त्यागातून व बलिदानातून उभा राहिलेला पक्ष आहे. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात, जिल्ह्यात व तालुक्यात सत्याग्रही मार्गाने विविध आंदोलने केले जाणार आहेत. मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी हे देशाचे एकांगी चित्र दाखवत असून तरुणांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ लढ्यासाठी संघटित होऊन काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे तसेच सत्ताधारी पक्षाची चालु असलेली हुकुमशाही, वाढती महागाई, पेट्रोल डीझेल दरवाढ, गॕस सिलेंडर दरवाढ, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ, रासायनिक खतांच्या किंमतीत झालेली वाढ, शेतीमालाच्या घसरलेल्या किंमती , सैनिक भरतीसठीची फसावी अग्निपथ योजना, राष्ट्रीय संसाधने व सरकारी उद्योगांची विक्री , अदानी घोटाळा, मा. राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावुन खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ तसेच मोदींनी लोकांच्या कष्टाच्या पैसा आणि राष्ट्राच्या संपत्तीची मोदी अदानी जोडीने चालविलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या लुट विरुध्द सुरु असलेल्या लढ्यात नेते राहुल गांधी यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी भारतवासीयांमध्ये जनजागृती निर्माण करुन तात्काळ निर्णय घेण्यासाठी कोपरगांव येथे ०३ एप्रिल २०२३ रोजी लोकशाही मार्गाने जय भारत सत्याग्रह सभा आयोजनाबाबत तहसिलदार यांना निवेदन देणार असुन मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन श्री. नागरे यांनी केले.       

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!