
जेऊर कुंभारी वार्ताहर
कै.दौलतराव पिराजी चव्हाण (आप्पा) यांचेकडून अनेक समाज तसेच गाव उपयोगी कार्य अतिशय निःस्वार्थ पणाने घडलेले आहे पुढे तोच वसा त्यांचे चिरंजीव मिलनभाऊ चव्हाण यांनी निरंतर चालू ठेवला आहे. कै.दौलतराव चव्हाण (आप्पा) व परिवार यांच्या कार्यामागे कुठलाही स्वार्थ व अपेक्षा देखील नाही. जी व्यक्ती कुठलीही अपेक्षा न करता निःस्वार्थ वृत्तीने फक्त समाजाला किवा लोक कार्याला मदतीचा हात देतो अशा व्यक्तींसाठी दोन शब्द आपणही व्यक्त केले पाहिजे. खरोखरच चव्हाण परिवार एक आदर्श आहेच. आम्हाला अभिमान वाटतो की, असा परिवार, अशा दानशूर व्यक्ती माझ्या जेऊर कुंभारी गावला लाभल्या आहेत. जो उचित कार्य करतो त्याचं गुणगान तर केलेच पाहिजे. आज जो सभामंडप मिलनभाऊ यांनी आप्पांच्या स्मरणार्थ उभा करुन जेऊरकुंभारी ग्रामपंचायतकडे सुपूर्त केला या सभामंडपामुळे गावातली अनेक धार्मिक विधी व विवाह सोहळे विनाखर्च पार पडतील, या समाज उपयोगी निःस्वार्थ कार्यातून अनेक कुटुंबांचे आशीर्वाद या कुटुंबाला अप्रत्यक्षरीत्या लाभतीलच यात काहीच शंका नाही. अशा कार्यांमुळे नव युवकांना देखील समाज कार्य करण्यास प्रोत्साहन नक्कीच मिळते. अशा व्यक्ती खूप खूप कमी असतात की, ज्यांच्याकडे काहीही न मागता हे लोकं समाजासाठी देत असतात. मागणी करुन देणारे खूप असतात परंतु मागणी न करता स्वतःहुन देणारे दाते खूप कमी असतात. चव्हाण परिवार हा मागणी न करता देणाऱ्यांच्या यादीत येतो याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे, या सभामंडपाच्या कार्याबद्दल मी महारुद्रा फाऊंडेशनच्या वतीने मिलनभाऊ चव्हाण व त्यांच्या परिवाराचे आभार मानतो व या कुटुंबाचे कार्य सूर्याच्या तेजाप्रमाने नेहमीच झळाळत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे प्रतिपादन महारुद्रा फाऊंडेशनचे शशिकांत वक्ते यांनी व्यक्त केले.


