
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री गोपालकृष्ण श्रीकांत सुवर्णपदक प्रदान !!
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी येथील कै. द्वारकानाथ वक्ते, महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांचे नातु कुणाल प्रदीप चव्हाण यांना १८ मार्च रोजी गुजरात मधील बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पार पडलेल्या ७१ व्या दीक्षांत समारंभात डॉ. जी.अर्चना यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर ऑफ सायन्स मायक्रोबायोलॉजी या विषयातील संशोधनाच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी गुजरातचे उच्च शिक्षण मंत्री मा. श्री.ऋषिकेश पटेल आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कुलगुरू राजमाता डॉ. शुभांगीनी राजे गायकवाड यांच्या
उपस्थितीत व भारताचे गृहमंत्री मा.अमित शहा यांच्या हस्ते ‘श्री गोपाल कृष्ण श्रीकांत सुवर्णपदक ‘ देऊन सन्मानित करण्यात आले.
कुणाल चव्हाण यांच्या यशाबद्दल संजवनी उद्योग समुहेचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे ,अहमदनगर जिल्हा बॅकेचे संचालक विवेक कोल्हे, तसेच जेऊर कुंभारी गावातील वक्ते परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी ग्रामीण भागातील तरूणांना आव्हान केले की शिक्षणाच्या जोरावर आपण आपल आयुष्य उज्जवल करू शकतो ग्रामीण भागातील नागरिकांचा मुख्य उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे ती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरी प्रमाणे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांना कर्ज काढून आपली शेती फुलवावी लागते अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तेव्हा बाळासाहेब वक्ते यांनी ग्रामिण भागातील तरूणांना शिक्षण हेच आपल उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती करावी असे भावनीक आव्हान केले.


