
जेऊर कुंभारी वार्ताहर
गोदावरी उजव्या कालव्यातून आवर्तन सुटून दहा दिवस उलटून गेले तरीही हरीसन ब्रँचचारी ला अद्याप पाणी नाही आवर्तन सुटल्यानंतर चितळीला पाणी पोहोचल्यानंतर हरिसन ब्रँचचारी ला तिसऱ्या दिवशी पाणी दिले जाते परंतु पाणी वेळेवर न दिल्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली आहे.
पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
हरिसन ब्रँचचारीने चांदेकसारे ,डाऊच खुर्द या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत असते विहिरींनी तळ गाठले आहे जनावरांना पिण्यासाठी पाणी सुद्धा राहिले नाही. उन्हाचा तडाखा वाढला असुन जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे
पण आता परिस्थिती बदलली आहे पाटबंधाऱ्याच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी वेळेवर न सोडल्यामुळे या भागामध्ये शेतकऱ्यांना शेती करावी की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आवर्तन सुटल्यानंतर कायमच जेऊर कुंभारी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पोटबंधारे विभागाच्या ऑफिसला जाऊन पाण्यासाठी भांडावे लागत आहे असे जर कायमस्वरूपी चालले तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा आकाश नागरे अध्यक्ष कोपरगाव तालुका काँग्रेस यांनी दिला.


