



कोपरगाव तालुका आणि शहर कार्यकारिणी जाहीर!!
कोपरगाव प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आरपीआयने केंद्रीय समाज कल्याण न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात नागालँड मध्ये दोन जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे यापुढेही महाराष्ट्रामध्ये आरपीआयची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून कोपरगाव तालुक्यात देखील गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता तयार करून पक्षाची ताकद वाढवावी असे प्रतिपादन आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी केले.६ मार्च रोजी आरपीआयचे राज्य सचिव दिपकराव गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली कोपरगाव येथे आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले की या पुढील निवडणुकांमध्ये मित्र पक्षांनी विश्वासात घेऊन आरपीआयला सत्तेमध्ये सन्मानपूर्वक वाटा द्यायला हवा. कोपरगाव तालुक्यातील बैठकीमध्ये उपस्थितांची संख्या बघून यापुढे कोपरगाव तालुक्यात निश्चितपणे आरपीआयचे काम दीपकरावजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे व्यवस्थित पार पाडतील. तर कुठलीही अडचण आल्यास कधीही फोन करा मी एका तासात कोपरगावात आपल्यासाठी उपस्थित असेल अशी ग्वाही थोरात यांनी दिली. तर विभागीय जिल्हाप्रमुख भीमा बागुल यांनी बैठकीसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून यापुढेही सर्वांनी एकजुटीने पक्षासाठी काम करावे असे प्रतिपादन केले.अध्यक्ष स्थानावरून बोलताना आरपीआयचे राज्यसचिव दिपकराव गायकवाड म्हणाले की कोपरगाव तालुक्यामध्ये मित्र पक्ष असणाऱ्या भाजपाकडून आरपीआयला यापूर्वीही मानाची वागणूक मिळाली असून यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आरपीआयला सन्मानाची वागणूक मिळून सत्तेमध्ये ही वाटा मिळेल अशी आशा असल्याचे म्हटले. दरम्यान आलेल्या मान्यवरांचे तालुकाध्यक्ष अनिल रणवरे यांनी स्वागत केले.सदर बैठकीमध्ये तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.नवीन कार्यकारिणी पुढीप्रमाणे तालुका उपाध्यक्ष फकीरा भाऊ साहेबराव चंदनशिव, तालुका सल्लागार सोमनाथ भाऊ सुभाष लोहकरे, उत्तर तालुका उपाध्यक्ष आकाश डोखे, दक्षिण तालुका उपाध्यक्ष राहुल सोनवणे, पूर्व तालुका उपाध्यक्ष अविनाश मोरे,पश्चिम तालुका उपाध्यक्ष प्रशांत मेहरखांब,तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब भारुड, तालुका संघटक किशोर मैंद, शहर अध्यक्ष रामदास कोपरे शहर उपाध्यक्ष उत्तर अजित कुशेर, शहर उपाध्यक्ष दक्षिण अनिस भाई शेख, शहर उपाध्यक्ष पश्चिम अमोल थोरात, शहर कार्याध्यक्ष सागर भाऊ कोपरे, शहर संपर्कप्रमुख संदीप जोशी, शहर संघटक फिरोज भाई अत्तार,शहर सल्लागार सचिन पगारे याशिवाय इतर महत्त्वाच्या पदांवर तालुका आणि शहर कार्यकारणी नियुक्त करण्यात आली. तर युवक आणि महिला कार्यकारिणी लवकरच बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष आणि जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात येईल असे प्रतिपादन आरपीआयचे तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे यांनी केले. सदर बैठकीसाठी राहता युवक तालुकाध्यक्ष करण कोळगे, श्रीरामपूर शहराध्यक्ष विजू पवार ,मनोज काळे, राहता तालुका संघटक सत्यजित कोळगे यांसह जेष्ठ नेते राजाभाऊ गायकवाड,दिलीप पगारे, डोखे, अर्जुन मोरे प्रशांत मेहरखांब, बाबासाहेब भारुड,किशोर दीपक शिंगारे ,संदीप कोपरे, संदीप धीवर, गणेश रणधीर, मनोज बोर्डे ,जनार्दन खरात, अशोक कांबळे, अरुण खरात, राजूभाई पठाण, सयाजी मोरे, सुनील आबासाहेब मोकळ,अलकाताई देवगावकर, वैशाली ताई सोनवणे,राहुल भातकुटे,किरण पाटोळे, आनंद कोपरे, सोनू आरणे,दिलीप काकळे, किशोर मैंड आदिंसह आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते प्रदीप दिपकराव गायकवाड यांनी केले. तर सदर बैठक यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष अनिल भाऊ रणनवरे ,सोमनाथ भाऊ लोहकरे, फकीर भाऊ चंदनशिव, रामदास भाऊ कोपरे,प्रदीप भाऊ गायकवाड, अमोल भाऊ थोरात, संदीप भाऊ दुशिंग, अनिस भाई शेख,आनंद कोपरे ,आकाश दुशींग,अविनाश मोरे, अमित भाऊ कुशेर, दीपक शिंगारे, सतीश पगारे,प्रशांत मेहरखांब, राहुल कोपरे, संदीप कोपरे,सुमित भाऊ पगारे, संजय कोपरे, सागर गायकवाड, सोमनाथ पाटोळे, अवी पगारे, किरण पाटोळे,रोहित डोखे, सुनील दुशिंग,फिरोज भाई अत्तार, दीपक रणनवरे, ज्ञानेश्वर घोडेस्वार,बिलाल शेख, गौतम वाघ,आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


