
जेऊर कुंभरी गावठाण शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!!
जेऊर कुंभारी वार्ताहर
तरुण पिढीसाठी टीव्ही व मोबाईल यांचा वापराचा अतिरेक होत असून त्याकडे पालकांनी जागरूक राहून लक्ष देणे गरजेचे असून उद्याचे भवितव्य आपण बिघडवतो की काय अशी भीती निर्माण झाली असून उद्याच्या बलशाली पिढीसाठी आपण काय देणार आहोत याचे चिंतन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जि प सदस्य व नामदेवराव परजणे पाटील गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील जि प गावठाण शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्र प्रमुख श्रीमती भोईर, माजी केंद्र प्रमुख दिलीप ढेपले, सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच ताराचंद लकारे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर वक्ते, पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड, बापुराव वक्ते, जालिंदर चव्हाण, महेंद्र वक्ते,संजय वक्ते, गंगुबाई जाधव, मधुकर वक्ते, नानासाहेब गुरसळ, कैलास खटाणे, राहुल लकारे, दिलीप लकारे, पत्रकार किसन पवार, पत्रकार सोमनाथ गव्हाणे, शिवजी वक्ते, सतिष पवार, नितीन लिंभोरे, किरण लकारे, विठ्ठल पंढोरे , नवनाथ सुर्यवंशी, अनुज ढुमणे, वाल्मिक खंडीझोड,
आदी सह ग्रामस्थ व पालक मोठया संख्येने उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली.
राजेश परजणे पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारची माध्यमे स्पर्धेत असताना जि प शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना त्याच तुला मोलाचे शिक्षण देत असून शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात मोलाचा सहभाग नोंदवून स्पर्धात्मक वातावरण तयार झाल्यामुळे गुणवत्ता वाढीस त्याची मदत झाली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची देखील गुणवत्ता वाढलेली आहे
कोविड काळात शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे खरं पाहिलं तर पालकांनी देखील मुलांसाठी वेळ देणे गरजेचे आहे. तरुण पिढी टीव्ही व मोबाईल यांच्याकडे जास्त आकर्षित होत असल्यामुळे पालकांनी जागृत राहणे आवश्यक आहे
उद्याच्या बलशाली पिढीसाठी आपण काय देणार आहोत याचे चिंतन होणे गरजेचे आहे.
पालकांनी मुलांना शाळेत काय शिकवले आहे याची विचारपूस केली पाहिजे तसेच पालकांनी देखील शाळेत जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे त्यामुळे आपला पाल्य याची शैक्षणिक स्थिती पालकांच्या लक्षात येते कारण शिक्षक कष्ट घेत असतात जादा तासिका घेत असतात परंतु आपणही आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी जागृत राहून शिक्षकांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे गुणवत्तेसाठी शाळेच्या विकासासाठी तत्पर असले पाहिजे.
तसेच शासनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या बदलांविषयी अत्यंत महत्त्वाचे भाष्य परजणे यांनी केले आहे ते म्हणाले की शिक्षकांच्या बदल्या वर्षातून एकदाच होणे गरजेचे आहे. चालू शैक्षणिक वर्षात आधी मधी बदली करू नये विनंती बदली ही १ ते १५ मे याच कालावधीमध्ये विनंती बदली करावी इतर प्रशासकीय बदल्या करू नये कारण याचा विपरीत परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो ही गोष्ट शासनाने पाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख म्हणाल्या की शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्ता देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी कोठेही मागे राहू नये यासाठी तांत्रिक गोष्टीवर देखील शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पालकांनी मुलांना मोबाईल व टीव्हीपासून दूर राहण्याविषयी योग्य ते संस्कार करावे मुलांमध्ये वाचनाची आवड थोरामोठ्यांचे रामायण महाभारत कथा ऐकण्याची गोडी निर्माण करावी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत हेच ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी पुढे देशाचे व गावचे नाव उज्वल करतील अशी आशा व्यक्त केली.
शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत साळवे यांनी प्रास्ताविकात शाळेबद्दल माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी आपल्या नाच गण्यातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले यावेळी चिमुकल्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरून मनमुराद आनंद लुटला. यावेळी ग्रामस्थ ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन श्रीकांत साळवे यांनी केले व आभार उपसरपंच ताराचंद लकारे यांनी मानले.
जेऊर कुंभारी : गावातील जि प गावठाण शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी मार्गदर्शन करताना जि प सदस्य राजेश परजणे, शबाना शेख, सरपंच सुवर्णा पवार आदी सह मान्यवर.



