
कोपरगाव प्रतिनिधी
धर्म राष्ट्र संस्कृती ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे माणूस फक्त आकाराने सिद्ध होत नाही तर विचार आणि संस्काराने तो सिद्ध होत असतो असे प्रतिपादन वरदविनायक संस्थान नेवासे चे प्रमुख ह भ प उद्धव महाराज मंडलिक यांनी चांदेकसारे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महादेव मंदिर खंडोबा मंदिर व शनी मंदिर या तीन मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या प्रसंगी आयोजित किर्तनात केले.
या प्रसंगी प.पु. रमेशगिरीजी महाराज, ह.भ.प. रघुनाथ महाराज खटाणे, शिवभक्त दत्तगिरी महाराज, प.पु. राघवेश्वरगिरी महाराज, ह.भ.प. मनसुख महाराज दहे, ह.भ.प. वैष्णव महाराज जाधव आदीसह संत गण उपस्थित होते.
उद्धव महाराज पुढे म्हणाले की भगवद्गीते मध्ये त्यागात शांती आहे असे सांगितले आहे मनुष्य प्राण्यावर पाच प्रकारची ऋण असतात यामध्ये देव ऋण, ग्रंथ ऋण, संतांचे ऋण, भूत ऋण आणि आई वडील यांचे ऋण आहेत. मधमाशीचे जर इतके उपकार असेल तर या प्राणीमात्रांचे या जीवसृष्टीचे आपल्यावर किती उपकार आहेत याचा विचार मनुष्य प्राण्यांनी केला पाहिजे. जगातला कोणताच आनंद निरंतर नसतो अध्यात्माशी जोडलेल्या माणसांना मात्र निरंतर आनंद मिळत असतो बाह्य जगातला आनंद फक्त भास आहे आणि अध्यात्म सेवेतील आनंद निरंतर आनंद. असतो
“उभारीला हात जगी जाणवली मात| देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी” || या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपल्या ओघवत्या व रसाळ वाणीतून उपस्थित जनसमुदायाला अत्यंत अनमोल असे मार्गदर्शन केले.
गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या मंदिर कामासाठी चांदेकसारे येथील तीन भाविक अशोक होन, भाऊसाहेब होन, किशोर होन यांनी मंदिर पूर्णत्वास जाईपर्यंत केस न कापणे चप्पल न घालणे व दुधाचे पदार्थ न खाणे असा संकल्प केला होता. त्यांचा उद्धव महाराज यांच्या हस्ते सन्मान करून आज त्यांनी त्यांच्या संकल्प सोडलेला आहे.
विभंडक ऋषी, गंगामाता संत जनार्दन स्वामी जंगलीदास माऊली यांच्या साधनेने पावन झालेली या भूमीमध्ये तसेच साई समाधी योगीराज तुकाराम बाबा तसेच ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत चांदेकसारे येथे ही तीन मंदिरे उभी राहणे ही अतिशय गौरवाची गोष्ट आहे असे ते म्हणाले.
तीन दिवस चाललेल्या या पूजा विधीची आज
शुक्रवार दि. ३।३।२०२३ रोजी शांतीसूक्त पाठ, उत्तरांग हावन, बलिदान शुभमुहूर्तावर मुर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहन पूर्णाहुती आरती हे कार्यक्रम आयोजित केले होते. विनोद जोशी व उमेश जोशी आदी सह ब्राह्मण वृंदांनी पूजा विधी यथासांग पार पाडला.
सकाळी ७.३० ते ९.०० यावेळेत प्राणप्रतिष्ठा व सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प उद्धवजी महाराज (नेवासा) यांचे जाहिर हरि किर्तनाने झाली.
जाहिरात



