
कोपरगाव प्रतिनिधी
कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच सुरेगावच्या विकासाचे प्रश्न सोडवून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील विकासाच्या बाबतीत सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे. हि परंपरा पुढे सुरु ठेवून सुरेगावच्या नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठी १९ कोटी रुपये निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.
सुरेगाव ग्रामपंचायतीच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित सुरेगाव व परिसरातील नागरिकांसाठी दिनांक १९ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शेवटच्या दिवशी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सुरेगावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून चित्रकला, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव वाबळे होते. यावेळी हवामान तज्ञ पंजाबराव डख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.हाळनोर, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सिकंदरपटेल, दगु गोरे, मोहनराव वाबळे, पंढरीनाथ जाधव, उद्योजक रणजित वाबळे, पांडुरंग ढोमसे, नामदेव कोळपे, भाऊसाहेब कदम, राजेंद्र निकम, जगनराव गोरे, नवनाथ गोरे, कैलास कदम, सुहासराव वाबळे, पं.स. विस्तार अधिकारी तोरणे, रविंद्र देवकर, अंबादास धनगर, शहाजापुरचे सरपंच सचिन वाबळे, मढीचे सरपंच प्रविण निंबाळकर, राहुल जगधने, प्रथम लोकनियुक्त सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर, तसेच सर्व सदस्य आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेगाव ग्रामपंचायतीच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित आयोजित विविध कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलतांना आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.


