Wednesday, April 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपले जीवन उज्वल करावे!!- सतिषराव आव्हाड

विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपले जीवन उज्वल करावे!!- सतिषराव आव्हाड

जेऊर कुंभारी वार्ताहर

शिक्षण हे विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करते विद्यार्थ्यांना शिक्षणामुळे चांगले गोष्टी साध्य करता येते तसेच शिक्षणामुळे सामाजिक व कौटुंबिक आदर वाटतो तसेच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येते असे प्रतिपादन महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात संचालक सतिषराव आव्हाड यांनी कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील पवार वस्ती येथे विर एकलव्य यांच्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले .
यावेळी विर एकलव्य,छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महर्षी शंकराव कोल्हे कारखान्याचे संचालक सतिषराव आव्हाड, जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सुवर्णा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विलास मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाभारतात वीर एकलव्यांचे विशेष महत्त्व आहे. जेव्हा गुरू शिष्याची चर्चा केली जाते.तेव्हा एकलव्य व द्रोणाचार्य यांची नावे आर्वजुन घेतली जातात पूर्वीच्या काळी गुरुकुल आश्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात असत.एकलव्य हे भिल्ल आदिवासी समाजाचे होते.त्यांनी गुरू द्रोणाचार्य यांचा पुतळा बनवून त्याची पूजा करत सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनून दाखवले. त्यांची गुरूवर अपार श्रद्धा होती. गुरू द्रोणाचार्य यांनी गुरूदक्षिणा म्हणून वीर एकलव्य यांचा अंगठा मागितला होता.तेव्हा मागे पुढे काहीही विचार न करता एकलव्याने आपल्या हाताचा अंगठा दिला.तेव्हा पासून वीर एकलव्य यांना श्रेष्ठ शिष्य म्हणून ओळखले जात आहे.
या कार्यक्रम प्रसंगी, महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक सतिषराव आव्हाड, जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सुवर्णा पवार ,दत्तु आगे एकलव्य संघटना अध्यक्ष कोपरगाव ,माधव माळी ,मोरे सर,सतिष पवार, बाबासाहेब गांगुर्डे, सुनील साळुंखे गणेश माळी, संदीप पवार, श्याम पवार, प्रवीण पवार ,भाऊसाहेब पवार, सुरेश पवार, रमेश पवार, सुभाष पवार, दिलीप पवार, संदीप पवार ,अशोक गायकवाड, रवींद्र गायकवाड, बाबासाहेब गांगुर्डे, सागर गांगुर्डे, संजय गांगुर्डे ,सोमनाथ बर्डे, विनोद पावसे, कुणाल त्रिभुवन, गणेश वाघ ,अनिल वाघ ,प्रणव जाधव, रोहित पवार ,अभय पवार ,पिनू पवार, रवी पवार ,श्रावण पवार ,तसेच समस्त अंबिका तरुण मंडळ उपस्थित होते
कार्यक्रमाची सांगता विर एकलव्य यांचा आरतीने झाली.सुत्रसंचालन सतिष पवार यांनी केले व आभार सरपंच सुवर्णा पवार यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!