Monday, April 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedजेऊर कुंभारी परिसरात बिबट्याची दहशत प्रशासनाचे दुर्लक्ष!!- संचालक बाळासाहेब वक्ते

जेऊर कुंभारी परिसरात बिबट्याची दहशत प्रशासनाचे दुर्लक्ष!!- संचालक बाळासाहेब वक्ते

जेऊर कुंभारी गावात पिंजरा लावण्याची मागणी!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात बिबट्याच्या बिनबोभाट फिरण्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केली आहे.
काल दि.१६ फेब्रुवारी रात्री जेऊर कुंभारी गावातील सुधाकर चव्हाण यांच्या घरासमोर रात्री ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या पाळिव प्राण्यावर हल्ला केला.
कुत्र्याच्या भुंकण्याने सुधाकर चव्हाण यांना जाग आली बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला हे पाहून सुधाकर चव्हाण यांनी आरडाओरडा केला त्यांचा आवाज ऐकुन शेजारी राहणारे रवि चव्हाण, शरद चव्हाण कैलास चव्हाण, शशिकांत चव्हाण,गोरक चव्हाण, दादासाहेब चव्हाण, आनंदा चव्हाण यांनी घटनेस्थळी धाव घेतली त्यांच्या प्रसंग सावधानाने कुत्र्याचा जिवल वाचला पण बिबट्याने कुत्र्याला चावा घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.अशाच प्रकारच्या घटना वारंवार जेऊर कुंभारी गावात घडत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले
या संदर्भात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, यांनी वनविभागाचे अधिकारी सोनवणे मॅडम यांना कळवले मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
जेऊर कुंभारी गावात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा संचार असल्याने शेतकरी, शेतमजूर, कारखान्यातील कामगार यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेऊर कुंभारी गावातील पाटीलबा वक्ते यांची वस्ती , हरीसन ब्रँच पांढरे वस्ती या ठिकाणी बिबट्या दिसल्याने यासंदर्भात वन विभागाला जेऊर कुंभारी गावचे सरपंच सुवर्णा पवार, संचालक बाळासाहेब वक्ते
संचालक सतिषराव आव्हाड,
पो.पा. बाळासाहेब गायकवाड, यांनी वेळोवेळी कळवुनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. पिंजरा लावण्याबद्दल विचारणा केली असता तालुक्यात फक्त सहा पिंजरे असुन जेथे असेल तेथुन ग्रामस्थांनी स्व खर्चाने पिंजरा घेऊन यावा आम्ही लावुन देऊ असे बेजबाबदार वक्तव्य वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याने वनविभागाला लोकांच्या जिवाची पर्वा नसल्याचे अधोरेखीत होते आहे बिबट्या डाऊच खुर्द ,घारी पोहेगाव या
गावात देखिल निदर्शनास आला आहे. सध्या शेतीत शेतकऱ्यांनी गहु,कांदे हे पीक केलेले आहे रात्रपाळीची लाईट असल्याने रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी व शेतमजूर जाण्यास तयार नाही त्यामुळे शेती पडीत पडते की काय असा प्रश्न या गावांमध्ये निर्माण झाला आहे. जर गावातील नागरिकांना काही इजा झाली तर याला सर्वस्वी वनविभागाचे अधिकारी जबाबदार असतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या बिबट्याचा बंदोबस्त वेळीच केला नाही तर जेऊर कुंभारी गावच्या सरपंच सुवर्णा पवार, संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक सतिषराव आव्हाड, माजी सभापती शिवाजी वक्ते ,माजी संचालक मधुकर वक्ते, पो. पा. बाळासाहेब गायकवाड ,आदीनी वन विभागाला उपोषणाचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!