
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील संत जनार्दन स्वामी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र गुरसळ व व्हा.चेअरमनपदी आनंदराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे
संस्थेच्या संचालक मंडळामध्ये मिलनभाऊ दौलतराव चव्हाण, शिवाजी मच्छिंद्र वक्ते, राजेंद्र गहिनाजी गुरसाळ, आनंदा गोकुळ चव्हाण, शिवाजी रामचंद्र शिरसाट, सुनील वसंतराव नाईक सुभाष बापूराव शिंदे, दिपक सिताराम गायकवाड ,सौ. मनीषा राजेंद्र गायकवाड ,सौ. कविता दादासाहेब पवार ,अशोक बाबुराव आव्हाड यांची संस्थेच्या संचालक मंडळात बिविरोधात निवड झाली आहे दि ३ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या सभागृहामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड बिनविरोधक पार पडली निवडणूक प्रक्रिया कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक एन जी ठोंबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिबंधक आर एन राहणे यांनी पाहिले त्यांना संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब जाधव यांनी मदत केली यावेळी संस्थेचे मार्गदर्शक मिलनभाऊ चव्हाण, कोल्हे कारखान्याचे माजी संचालक मधुकर वक्ते, दादासाहेब पवार ,माजी अध्यक्ष शिवाजी वक्ते आधी सह संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. संस्थेचे मार्गदर्शक मिलनभाऊ चव्हाण यांनी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गुरसळ व उपाध्यक्ष आनंदा चव्हाण यांनी पदभार दिला संस्थेच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मिलनभाऊ चव्हाण यांनी सांगितले की संस्था ही सभासदांची जननी असून ठेकेदार व कर्जदारांचा विश्वास संस्थेने मिळवला आहे पदाधिकारी यांनी संस्थेचे व सभासदांचे हिताचे काम करावे असे सांगण्यात आले शेवटी व्यवस्थापक बाळासाहेब जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.


