
कोपरगाव प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती सोमवार दि २३ जानेवारी २०२३ रोजी कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आलेयाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, रवींद्र पाठक, रवींद्र सोनवणे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, विक्रमादित्य सातभाई, भाजपा युवा मोर्चाचे अविनाश पाठक, भाजपाचे अध्यक्ष दत्ता काले, शिवसेनेचे सनी वाघ, कैलास जाधव, ज्ञानेश्वर गोसावी, कुणाल लोणारी, आशिष निकुंभ, निखिल जोशी, शुभम भावसार, पप्पू पडियार आदी सह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी विवेक कोल्हे बोलताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकिय सामाजिक जीवनात काम करत असताना कोणत्याही परिणामाचा विचार न करता परखड देशहितासाठी कार्य केले तो त्यांचा गुण आजच्या राजकिय जीवनात सर्वांनी आत्मसात करावा तसेच गेल्या दोन अडीच वर्षपासून राज्यात ज्या राजकिय घडामोडी घडत आहे त्या बाळासाहेब असते तर झाल्याचं नसत्या अशी खंत या प्रसंगी कोल्हे यांनी व्यक्त करत केली आझाद हिंद सेनेची स्थापना करून स्वातंत्र्य लढा बळकट करणारे नेताजी सुभाष चंद्र बोस हे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते असे बोलून दोन्ही महापुरुषांना अभिवादन केले.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवराचे स्वागत माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी केले तर आभार विक्रमादित्य सातभाई यांनी व्यक्त केले.


