Monday, April 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedजय - पराजय पचविण्याचे सामर्थ्य क्रीडा स्पर्धांमधून मिळते!!-वासुदेव देसले.

जय – पराजय पचविण्याचे सामर्थ्य क्रीडा स्पर्धांमधून मिळते!!-वासुदेव देसले.

कोपरगाव प्रतिनिधी

क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थी संघटीत होतात व त्यांच्या मधील सांघिक भावना वाढीस लागते.
त्याच बरोबर स्पर्धामधुन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. जय व पराजय
पचविण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस
स्टेशनचे पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव येथील संत जनार्दन
स्वामी महाराज महर्षी स्कुलच्या २५ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धाच्या बक्षीस वितरण समारंभा-
प्रसंगी केले. प्रमुख उपस्थीती संत जनार्दन स्वामी ट्रस्टचे विश्वस्त प. पु. रमेशगिरी महाराज,
सनदी लेखापाल अशोक गुरजर तर सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष
दत्तात्रय होळकर हे होते सदर प्रसंगी उपाध्यक्ष विलास कोते पा., अॅड. अनिल जाधव, संदिप चव्हाण, शिवनाथ शिंदे , तात्यासाहेब गोंडे
तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीरंग झावरे, व्यवस्थापक विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना देसले
म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या आई वडीलांचा आदर केला पाहीजे मोबाईलचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी करा मोबाईलच्या आहारी जाऊन शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडवू नये, असे ते म्हणाले.
अशोक गुरजर म्हणाले की स्पर्धेच्या युगात ज्ञानाला खुप
महत्त्व आहे. जेवढे ज्ञान तुम्हाला शालेय जिवनामध्ये आत्मसात करता येते तेवढे जास्त करा.
शारीरीक तंदुरूस्तीसाठी क्रीडा स्पर्धामधील विद्यार्थ्याचा सहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी केलेतर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शादमीन सय्यद व सुरज तुवर यांनी केले तर आभार क्रीडा
विभाग प्रमुख शिवप्रसाद घोडके यांनी मानले कार्यक्रम सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
योगेश बिडवे के गणेश वाकचौरे, प्रिया बोधक यांसह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!