
जेऊर कुंभारी वार्ताहर
शिर्डी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात घडला असुन हा अपघात पाथरे गावानजीक हॉटेल वनराई जवळ ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी आराम बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे.अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे गावानजीक हॉटेल वनराईच्या जवळ बस क्रमांक MH 04 FK 2751 व मालवाहतूक ट्रक क्रमांक MH 48 T 1295 यांच्या समोरासमोर अपघात होऊन १० मृत्युमुखी पडले आहेत तर ३५ जण गंभीर जखमी आहेत. ठाणे अंबरनाथ कल्याण उल्हासनगर परिसरातून सदर बस शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना वावी पाथरे दरम्यान टोल नाक्याच्या पुढे एकेरी वाहतूक असल्याने हा अपघात समोरासमोर झाल्याचे समजते.यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना शवविच्छेदनासाठी सिन्नर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.जखमींना नाशिक, सिन्नर अशा ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. दरम्यान मृतांची नावे पुढीलप्रमाणे :-
१) प्रमिला प्रकाश गोंधळी,वय-४५,
२) वैशाली नरेश उबाळे, वय ३२,
३) श्रावणी सुहास बारस्कर,वय ३०,
४) श्रध्दा सुहास बारस्कर, वय-४
५) नरेश मनोहर उबाळे,वय-३८ या सर्व रा.अंबरनाथ मुंबई
६) बालाजी कृष्णा मोहंती, वय-२५ (ड्रायव्हर)
७)दिक्षा संतोष गोंधळी, वय-१८ रा.कल्याण
उर्वरित ३ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही.
अपघात झालेल्या रुग्णांना पुढील रुग्णालयात उपचार सुरू आहेत
१)मातोश्री हॉस्पिटल-०३
२)डॉ. साळुंखे हॉस्पिटल-०१
३)यशवंत हॉस्पिटल-१६
एकूण- २० प्रवाशांवर उपचार सुरू असूनसिन्नर रुग्णालयातून ४ किरकोळ जखम झालेल्या प्रवाशांना उपचार नंतर सोडण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी अपघातग्रस्तांना केली मदत जाहीर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच अपघाताची चौकशी करण्याचे देखील निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.


