
कोपरगाव प्रतिनिधी
कलियुगात हरिनाम श्रेष्ठ आहे, तेंव्हा प्रत्येकाने नामस्मरण जरूर घ्यावे त्याची भगवंताच्या दरबारात नोंद होते असे प्रतिपादन ह. भ. प. निवृत्ती महाराज ठाणगांवकर यांनी केले. तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमीत्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे पहिले पुष ९ जानेवारी रोजी कान्होपात्रेच्या अभंगाने गुंफण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठ चालक ह. भ. प. तुकाराम महाराज वेलजाळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषi सांगितली. ह. भ. प. अरूणभैय्या पगारे (सिन्थेसायझर) सोमनाथ तळेकर (तबला) मंगेश खैरनार, रामभाऊ महाराज चौधरी हे किर्तन महोत्सवात संगीत साथ करत आहेत. ह. भ. प. निवृत्ती महाराज ठाणगांवकर पुढे म्हणाले की, ब्रम्हलिन संत रामदासीबाबांबरोबरच अन्य संत महंतांचा कोकमठाण पंचक्रोशीला मोठा आर्शिवाद लाभलेला आहे. मनुष्य जन्म एकदाच लाभत असतो तेंव्हा प्रत्येकांने मिळालेला देह भोजनाएैवजी भजनात अधिक व्यग्र होईल हे पहावे. कमी वयात संत ज्ञानेश्वरांनी विश्व कल्याणाचा मंत्र ज्ञानेश्वरीतुन दिला. संत महंतांनी ग्रंथातुन प्रबोधन केले त्याचे वाचन प्रत्येकाने ठेवावे. ग्रंथ हेच आपले गुरू आहेत. नामाचा मुळपुरूष निवृत्तीनाथ आहे. सत्संग घडला तर आपल्याला सभोवतालच्या मानवी गुणाची ओळख होते असेही ते म्हणाले. तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमीत्त किर्तन महोत्सवात हभप निवृत्ती महाराज ठाणगांवकर यांनी पहिले पुष्प गुंफले


