Sunday, April 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedजेऊर कुंभारी येथील पुलाखालील रस्त्यांची खोली वाढवावी!!- माजी सरपंच यशवंत आव्हाड

जेऊर कुंभारी येथील पुलाखालील रस्त्यांची खोली वाढवावी!!- माजी सरपंच यशवंत आव्हाड

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातुन जाणाऱ्या बहुचर्चित समुद्धी महामार्गचे काम अंतिम टप्प्यात आले असून जेऊर कुभांरी गावात नागरिकांना येण्याजाण्यासाठी पुल बांधण्यात आला पण त्या पुलाची उंची कमी असल्यामुळे जड वाहतूक करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे.
वाहतुकीच्या दुष्टीने हा रस्ता महत्त्वाचा असुन हा दुसऱ्या गावांनाही जोडणारा आहे काल किरण शिंदे यांच्या उसाला तोड आली असताना उसाने भरलेला ट्रक्टर पुला खाली अडकला केला तेव्हा ट्रॅक्टर निघणे अवघड होते.तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाला होती
तेव्हा प्रसंग सावधान राखत माजी सरपंच यशवंत आव्हाड, शेतकरी किरण शिंदे यांनी जेसेबिच्या साह्यांने उसाने भरलेला ट्रक्टर
दोन तासाच्या अथक परिश्रमाने पुला खालून सुकरूप बाहेर काढण्यात आला असे जर चालू राहीले तर शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे येणे कठीण होईल तसेच या रस्त्यांने शाळकरी विद्यार्थींची बस, हारवेस्टर, बोरवेल गाडी, ट्रक अशी साधने पुलाखालून जाने जिकारीचे झाले आहे तेव्हा पुलाखालील रस्त्यांची खोली वाढवावी असे प्रतिपादन माजी सरपंच यशवंत आव्हाड यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की जेऊर कुंभारी परिवारातील अनेक शेतक-यांच्या साईपिंग समुद्धी महामार्गत तोडण्यात आल्या पण त्या अद्यापही जोडून दिलेल्या नाही पाणी असुन देखील शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिके देता येत नाही हा समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे तसेच पुलाची उंची वाढवावी असे वारंवार सांगुन ही राज क्टरेक्शन दुर्लक्ष केले आहे त्यामुळे नागरिकांनी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे असे माजी सरपंच यशवंत आव्हाड यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!