Sunday, April 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिळवंडे कालव्यांच्या रखडलेल्या कामाच्या बाबतीतल्या बैठकांचा फार्स बंद करावा!!- नितीनराव शिंदे, अध्यक्ष...

निळवंडे कालव्यांच्या रखडलेल्या कामाच्या बाबतीतल्या बैठकांचा फार्स बंद करावा!!- नितीनराव शिंदे, अध्यक्ष कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी.

कोपरगाव प्रतिनिधी

पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधि पासुन निळवंडे धरणाचे पाणी मिळेल अशी जिरायती भागातील शेतकऱ्यांची आशा होती परंतू आजतागायत त्यांना न्याय मिळू शकला नाही ही फार खेदाची बाब आहे.२००८ सालापासून निळवंडे धरणात अडवलेले पाणी जिरायत भागात मिळत नाही हा एक प्रकारचा त्यांच्यावर अन्याय होत आहे असे कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितिनराव शिंदे यांनी म्हटले आहे जिल्ह्यातील बाकीच्या बागायत भागाला अन्य पर्याय उपलब्ध आहेत परंतु रांजणगाव तळेगाव या जिराईत भागाला निळवंडे धरणातील पाण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. महाविकास आघाडीच्या काळात अत्यंत सुरळीत चालू असलेलं काम गौणखनिज मिळत नाही म्हणुन रखडत आहे कारण फारच कमालीचं अस्वस्थ करणारं आहे, केंद्र व राज्यातील सरकारने या परिसरातील जनतेच्या सहनशक्तीची अधिक परीक्षा पाहू नये. राज्यातील हे शेतकरी विरोधी सरकारला सुबुद्धी मिळो, शेतकरी हिताची म्हणजेच पिक विमा असेल,अतिवृष्टी नुकसान भरपाई, कोपरगाव संगमनेर कोपरगांव व्हाया रांजणगाव रस्ता दुरुस्ती असो वा निळवंडे कालवे पूर्ण करणे कामी गौण खनिज उपलब्ध होऊन न देणे मुळे निर्माण झालेला प्रश्नांबाबत लवकरात लवकर सोडवावा तसेच सध्याच्या निळवंडे कालव्यांच्या रखडलेल्या कामाच्या बाबतीतल्या बैठकांचा फार्स बंद करावा अन्यथा कोपरगाव तालुका काँग्रेसच्या वतीने कोपरगांव तालुक्यातील रांजणगाव,जवळके परिसरात लवकरच रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!