
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील शामराव कल्याणराव वक्ते यांची जेऊर कुंभारी शिवारात गट नंबर ९१ मध्ये तिन एकर शेती असून सदर शेतीतील विहिरीवरील लक्ष्मी कंपनी अश्वशक्ती पाणबुडी काल रात्री अज्ञात चोरट्यांने चोरून नेली आहे.सध्या
शेतात रब्बी चे गहू हरबारा कांदा पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांच्याची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपले शेत फुलवण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यात नैसगिर्क आपत्ती ला देखील सामोरे जावे लागते.
सविस्तर वृत्त असे की
शेतकरी शामराव वक्ते यांनी दिनांक २५.११.२०२२रोजी रात्री १० वाजे सुमारास नेहमीप्रमाणे शेतात जाऊन इलेक्ट्रॉनिक मोटर चालू करून शेतीला पाणी भरले व रात्री १२ वाजता काम संपवून मोटर बंद करून घरी गेले व त्यानंतर दिनांक २६.११.२०२२ रोजी सकाळी आठ वाजता शेतीवर गेलो तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मोटरीचे पाईप फुटलेले दिसले त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना इलेक्ट्रिक मोटार कोणीतरी अन्यात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले.ही घटना शेजारच्या शेतकऱ्यांना सांगितली पण यात माझ्यीच मोटार व केबल चोरी गेले आहे हे लक्षात आले.
महिन्या पुर्व महर्षी शंकरराव
कोल्हे कारखान्याचे माजी संचालक मधुकर वक्ते यांच्या शेतीतील दोनदा विद्युत रोहित्रे चोरट्यांनी फोडले असेच जर चालू राहीले तर शेतकऱ्यांनी आपली शेती कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.जेऊर कुंभारी परिसरात विद्युत रोहित्रे, विद्युत मोटारी चोरीचे प्रमाण मोठे प्रमाणात वाढले आहे तेव्हा पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालावे व चोरट्यांच्या मुसक्या आवळावे अशी मागणी शामराव कल्याण वक्ते यांनी केली आहे.


