
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील घारी गावातील ग्रामस्थांनी सरकार मान्य स्वस्त धान्य दुकाना संदर्भात तालुका तहसील कार्यालयात निवेदन देत तक्रार दिली आहे ज्यावेळी घारी ग्रामस्थ तहसील कार्यालयात असताना त्यांनी आपल्या व्यथा प्रहार कार्यकर्त्यांना सांगितल्या त्यावेळी प्रहार पदाधिकाऱ्यांनी विनंती केली की घारी गावातील नागरिकांना सहा महिने धान्य मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे त्याबाबत तहसीलदार विजय बोरुडे यांनी लक्ष घालावे अशी विनंती यावेळी प्रहार तालुका अध्यक्ष संदीप क्षीरसागर, प्रहार शेतकरी आघाडीचे घारी गावचे तालुकाध्यक्ष किसन पवार, प्रहार विद्यार्थी तालुकाध्यक्ष आकाश काळे, नवनाथ वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते, तर निवेदनामध्ये घारी गावाच्या शशिकला खरात, मंगल माळी, संगीता खरात, रुशाली पवार, सुमनबाई शिंदे, अंबिका खरात,मीरा रतन माळी, सुनीता गणेश वाघ, लता पवार, शकीला शेख भाऊसाहेब खरात आदी सह ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.


