
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावठाण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज २३ नोव्हेंबर रोजी निपुण भारत व निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत माता- पालक गट कार्यशाळा व मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आला होता.
आपल्या पाल्यांचा शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी कोरोना काळात झालेले विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षक व पालकांनी कंबर कसून काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पंचायत समिती कोपरगावचे विशेष शिक्षक
राजेंद्र पाखरे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व महिला पालकांनी गट मातांनी आपले अनुभव आलेल्या अडचणी व नाविन्यपूर्ण उपक्रम उपस्थितांसमोर मांडले व आपल्या पाल्याचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावता येईल याबाबत साधक बाधक चर्चा केली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिक्षिका.सौ.वंदना पर्वत यांनी सांगितले की, वयानुसार व क्षमतेनुसार विद्यार्थ्यांचा विकास कसा घडला जातो व त्यानुसार त्याची आयुष्याची जडणघडण होत असते . यावेळी शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांचे आरोग्य शैक्षणिक गुणवत्ता, माता-पालक- शिक्षक सुसंवाद आदी विषयावर चर्चा करण्यात आली. या,कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका दिवे मॅडम, शालेय आहार मदतनीस सौ.मंदा परसैय्या, विद्यार्थी माता पालक, सौ.योगिता खटाणे ,सौ.सपना पर्हे, सौ.विद्या पंडोरे, सौ.रूपाली लिंभुरे, सौ.मनिषा पंडोरे, सौ.रंजना पवार, सौ.शशिकला लिंभुरे, सौ.पुनम लिंभुरे, सौ.लक्ष्मी लिंभुरे, सौ.सुजाता लिंभुरे, सौ.कविता लिंभुरे, सौ.किर्ती पंडोरे, सौ.कावेरी लकारे, सौ.संगिता गुरसळ,सौ.मंदाबाई लकारे श्री.सचिन लिंभुरे, ग्रा.पं.शिपाई संतोष बोरावके, पञकार सोमनाथ गव्हाणे, ग्रा.पं. सदस्य किशोर वक्ते, मुख्याध्यापक श्रीकांत साळवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन मुख्याध्यापक श्री. श्रीकांत साळवे सर यांनी केले तर, आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री किशोर वक्ते यांनी मांडले.


